शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बैलांच्या शर्यत बंदीविरोधात चाकणमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: January 21, 2017 21:12 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 21 -बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवा अन्यथा पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे हत्यार उगारले जाईल, असा ...

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21 -बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवा अन्यथा पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे हत्यार उगारले जाईल, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांसह बैलगाडा मालक, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, गाडा शौकीन व हजारो शेतकऱ्यांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-नासिक महामार्गावर घोडी व बैल सोडून तब्बल अर्धा तास महामार्ग रोखला. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.
 
'संस्कृती टिकवा, पेटा हटवा,' 'बैल वाचवा, शेतकरी वाचवा,' पेटा हटवा, बैल वाचावा', अशा आशयाचे व जाहीर निषेधाचे फलक हातात घेऊन 'बैल आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा', 'कायद्यात बदल झालाच पाहिजे,' अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी व बैलगाडा शौकिनांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात्रा-जत्रांचा मोसम सगळीकडे सुरू झाल्याने बैलगाडा शर्यत बंदी हटवण्यासाठी प्राणिमित्र संघटनेच्या विरोधात चाकण येथे शेतकरी व बैलगाडा मालकांनी मोठे आंदोलन करून पुणे - नाशिक महामार्ग अडवून शर्यती त्वरित सुरू करावी, असे निवेदन तहसिलदारांकडे दिले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविण्यात यासाठी संपूर्ण राज्यात मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे यावेळी बैलगाडा मालक चालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
 
यावेळी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, "काही संघटना, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश प्रशासन व आम्ही सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आवाहन करीत होतो. लोकसभेतही तीन वेळा बैलगाडा बंदी संदर्भातील मागणी उठवावी आणि बैलांचा समावेश विशेष यादीतून वगळावा यासाठी प्रयत्न केला. पर्यावरण मंत्र्यांना बैलगाडा मालकांसह भेटून निवेदने दिली. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटलो. वटहुकूम पास करण्याची जी मागणी आज होत आहे, ती अडीच वर्षांपूर्वी लोकसभेत केली होती." ते म्हणाले, प्रकाश जावडेकर यांनी वटहुकूम काढण्याऐवजी एक नोटिफिकेशन काढले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला, निर्णयाला एखाद्या मंत्र्यांचे नोटिफिकेशन हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा मोठे होऊ शकत नाही. म्हणून त्यास ७ जानेवारी २०१६ रोजी आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले. कायदा करायचा असेल तर तो लोकसभेत करावा असे कोर्टाने सांगितले. त्याला कायदेविभागाची मंजुरी मिळाली असून कॅबिनेट मध्ये मंजुरी घेऊन लोकसभेत बिल प्रस्तुत होऊन त्याच्यावर चर्चा शिवून मंजूर करून घेणे हा पर्याय आहे.
 
ते पुढे म्हणाले, "तामिळनाडू राज्यात जो आक्रोश आहे तो जनशक्तीचा आहे, तेथील आंदोलनाला श्री श्री रविशंकर, अभिनेते रजनीकांत, कमल हसन, ए.ए. रेहमान हे सर्व या आंदोलनात उतरून पाठिंबा देतात, मग महाराष्ट्रात काय चाललंय? आपले नेते व अभिनेते का नाही आंदोलनाच्या पाठीशी ? आता शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस जिंदाबाद नाही, कोणत्याही पक्षाचा आवाज काढायचा नाही, तर सगळ्यांनी एकत्र या, राजकारण बाजूला ठेवा, आणि सुप्रीम कोर्टात राजकारण विरहित लढा द्या. तरच सरकारला जाग येईल."
 
पेटावाल्यांचा विरोध का?
आढळराव पुढे म्हणाले, पेटावाल्यांना या कामासाठी परदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो, आणि ते त्यांना दाखवावे लागते. पेटावाले घोड्याच्या शर्यती बंद करू शकत नाहीत, ऊस वाहतुकीच्या गाडीची मर्यादा ७५० किलो असताना अडीच ते तीन टन वाहतूक करताना पेटवाल्यांना दिसत नाही का?  खोटी छायाचित्रे सुप्रीम कोर्टाला सादर करून आतापर्यंत बैलगाडा मालकांवर अन्याय केला.
 
ते म्हणाले,"राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. बैलगाडा शर्यतीबंद असल्यामुळे कित्येक पिढ्यांपासून चालू असलेल्या बैलगाडा शर्यतीतील बैलांचा अमानुष छळ केला जातो, असं कारण न्यायालयात दाखवत या शर्यती प्राणिमित्र सघंटनेनी बंद करण्यात याव्यात, अशी याचिका दाखल केल्यावर राज्य सरकारने कुठलेही हालचाल न केल्याने न्यायालयाने या शर्यतीवर पूर्ण बंदी आणली. त्यामुळे गेल्या दोन  वर्षापासून या बैलगाडा शर्यती बंद झाल्या आहेत."
 
आमदार सुरेश गोरे बोलताना म्हणाले की, "खेड तालुक्याला आंदोलनाची परंपरा आहे असून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी चाकण येथे पहिले आंदोलन करून आंदोलनाची सुरुवात केली. राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून बैलगाड्यांच्या आंदोलनासाठी एकत्र आलोय. यासाठी कुणीही राजकारण करू नये. असे प्रतिपादन आमदार सुरेश गोरे यांनी केले."
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, "गोवंश हत्या बंदीने काय साधले? भाकड जनावरे बेवारस सोडून देताना ती अन्न, अन्न करून मारतात, तेव्हा कुठे जातात प्राणीमित्र. त्याचे पाप माथ्यावर? सरकार बदलले म्हणून आत्महत्या थांबल्यात का? असा सवाल करून आज शर्यतीच्या बैलांवर बंदी केली, उद्या औताला व बैलगाडीला जपायला बंदी केली, तर काय करायचे? एक महिन्यात बैलगाडा चालू करतो म्हणणाऱ्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. यावर आमदार सुरेश गोरे यांनी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी सर्व पाक्षीय लोक एकत्र आले असताना त्यात कुणी राजकारण आणू नये, असे सांगितले.
 
 
 
तामिळनाडू मधील जलिकट्टूला लवकर हिरवा कंदील मिळून त्या स्पर्धा सुरू होतील, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे येत्या दोन दिवसांत पाठपुरावा करून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, असे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ टाकळकर यांनी सांगितले. प्राणिमित्र संघटनेच्या कुठल्याही सदस्यांना बैलांच्या संगोपनाची माहिती नाही, विनाकारण स्वतःच्या हव्यासापोटी शेतकर्‍यांच्या आवडत्या खेळाला विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारची संपूर्ण माहिती नाही घेता ही प्राणिमित्र सघंटना काम करत आहे. येत्या काही दिवसांत आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभे करणार असेही ते म्हणाले. 
 
 
एक्स्प्रेस हायवेवर रास्ता रोको
रविवारी सकाळी दहा वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर व सातारा जिल्ह्यातील कराड येथे तर मंगळवारी २४ तारखेला मावळ तालुक्यात आंदोलन करून पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे अडविण्यात येणार आहे.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844p1a