शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

VIDEO- पुलाअभावी थर्माकॉलवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 28, 2016 16:59 IST

पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 28 - पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे. पुलाअभावी नागरिकांना चक्क चप्पूचा आधार घ्यावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही स्थिती निर्माण होत असताना पूल बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे.कुसळंबपासून हाकेच्या अंतरावर  असलेल्या लांबरवाडी परिसरात वाड्यावस्त्या स्थिरावलेल्या आहेत. कृष्णा खोऱ्यांतर्गत मोठा साठवण तलाव झाल्याने वाड्यावस्त्यांच्या चोहोबाजूने पाणी साठत आहे. त्यामुळे वस्ती आणि गावाचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांना चप्पूवर थर्माकॉल अंथरून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाही तर शेळ्या, लहान-लहान जनावरे, किराणा सामान, चारा आदी वस्तूंचेही यावरूनच ने-आण केली जाते. तलावाच्या दोन्ही टोकांना दोरखंड बांधला असून, त्याआधारे विद्यार्थी शाळेत मार्गस्थ होत आहेत.नागझरी वस्ती, मालेवस्ती, केकाणवस्ती, आजबेवस्ती, खिळेवाडीवस्ती, वाल्हेकरवस्ती येथील ग्रामस्थांना हे रोजचे काम झाले आहे. दोन वर्षांपूर्वीही अशीच अवस्था असताना शेतातून चारा घेऊन येत असताना दोन महिला पाण्यात बुडल्या होत्या. त्यापैकी अनिता देविदास लांबरूड यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर शोभा आप्पासाहेब लांबरूड यांना ग्रामस्थांमुळे जीवदान मिळाले होते. संपूर्ण वस्त्यांना तलावाचे पाण्याने वेढले असल्याने नागरिकांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही अशीच कसरत करून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पूल उभारण्याची मागणी वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी केली आहे.तलावामुळे पाणीसाठा आहे, मात्र पूल नसल्याने जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना रोजचा प्रवास करावा लागत आहे. यासंबंधी प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील दुर्लक्ष झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. पूल बांधून ग्रामस्थांची व्यवस्था करावी.