शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

VIDEO- पुलाअभावी थर्माकॉलवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 28, 2016 16:59 IST

पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 28 - पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे. पुलाअभावी नागरिकांना चक्क चप्पूचा आधार घ्यावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही स्थिती निर्माण होत असताना पूल बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे.कुसळंबपासून हाकेच्या अंतरावर  असलेल्या लांबरवाडी परिसरात वाड्यावस्त्या स्थिरावलेल्या आहेत. कृष्णा खोऱ्यांतर्गत मोठा साठवण तलाव झाल्याने वाड्यावस्त्यांच्या चोहोबाजूने पाणी साठत आहे. त्यामुळे वस्ती आणि गावाचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांना चप्पूवर थर्माकॉल अंथरून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाही तर शेळ्या, लहान-लहान जनावरे, किराणा सामान, चारा आदी वस्तूंचेही यावरूनच ने-आण केली जाते. तलावाच्या दोन्ही टोकांना दोरखंड बांधला असून, त्याआधारे विद्यार्थी शाळेत मार्गस्थ होत आहेत.नागझरी वस्ती, मालेवस्ती, केकाणवस्ती, आजबेवस्ती, खिळेवाडीवस्ती, वाल्हेकरवस्ती येथील ग्रामस्थांना हे रोजचे काम झाले आहे. दोन वर्षांपूर्वीही अशीच अवस्था असताना शेतातून चारा घेऊन येत असताना दोन महिला पाण्यात बुडल्या होत्या. त्यापैकी अनिता देविदास लांबरूड यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर शोभा आप्पासाहेब लांबरूड यांना ग्रामस्थांमुळे जीवदान मिळाले होते. संपूर्ण वस्त्यांना तलावाचे पाण्याने वेढले असल्याने नागरिकांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही अशीच कसरत करून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पूल उभारण्याची मागणी वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी केली आहे.तलावामुळे पाणीसाठा आहे, मात्र पूल नसल्याने जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना रोजचा प्रवास करावा लागत आहे. यासंबंधी प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील दुर्लक्ष झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. पूल बांधून ग्रामस्थांची व्यवस्था करावी.