शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

VIDEO - `वाय-फाय शुभारंभात आर्चीसोबत बीडकर झिंगाट!

By admin | Updated: August 6, 2016 15:41 IST

येथील पालिकेच्या वतीने शनिवारी शहरवासियांसाठी मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.

संजय तिपाले, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 6 -  येथील पालिकेच्या वतीने शनिवारी शहरवासियांसाठी मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू (आर्ची)ची प्रमुख उपस्थिती होती. तिची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई अक्षरश: सैराट झाली होती.
 
शहरातील सिद्धीविनायक कॉम्लेक्स समोरील डीपीरोडवर हा सोहळा दुपारी बारा वाजता अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्षा डॉ. रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीमोद्दीन इनामदार यांच्यासह पालिकेचे सभापती, नगरसेवकांची उपस्थिती होती. संगणकावर ‘क्लिक’ करुन वायफाय सेवेचा प्रारंभ झाला.
 
यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, जग हे वैश्विक खेडे असून वायफायसारख्या सुविधेमुळे विद्यार्थी, तरुणांना जगाशी स्पर्धा करणे सुकर होणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर आहे. त्यासाठी पालिका कटीबद्ध असून मूलभूत सुविधांसोबत आता इंटरनेटसारखी सुविधा देण्यातही अग्रेसर आहे. आर्चीचा आदर्श घेऊन बीडच्या मुलींनीही नाट्य, कला क्षेत्रात पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, बीडमध्ये वायफाय सुविधा देण्यास व त्याच्या प्रारंभ कार्यक्रमास आर्चीला आणण्यास विरोध झाला; परंतु आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय आता पुढे जाता येणार नाही. त्यामुळे विरोध झुगारुन वायफाय सुविधा उपलब्ध केली. आर्चीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अतिशय कष्टातून तिने कमी वयात यश संपादन केले. बीडच्या तरुणाईपुढे आयकॉन असावा, त्यामुळे तिला खास बीडकरांच्या भेटीला आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकासाला विरोध करणाºयांनी स्वत: एक तरी काम केले का? याचे उत्तर द्यावे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 
 

मराठीत सांगितलेलं कळत नाही का...
 
अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर अवतरताच उपस्थित तरुणांनी ‘आर्ची.. आर्ची... असा पुकार केला. त्यानंतर तिने हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. यावेळी तिच्यासोबत सेल्फी घेऊन हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी बच्चेकंपनींसह तरुणाईची अक्षरश: उडी पडली होती. आर्चीची एक झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी महिलांनीही लक्षणीय गर्दी केली होती. तिच्या भाषणाची सर्वांनाच उत्कंठा होती; परंतु तिने अवघ्या दोन मिनिटांचा संवाद साधला. ‘बीडकरांनो नमस्कार, असे म्हणत तिने संवादास सुरुवात केली. ती म्हणाली, वायफाय सुविधेचा उद्घाटनाला येता आले, याचा आनंद  वाटला. खूप चांगला उपक्रम आहे, असे सांगून तिने बीडकरांना शुभेच्छाही दिल्या. जाताना ‘थँक यू’ म्हणायलाही ती विसरली नाही. शेवटी तिने ‘सैराट’मधील प्रसिद्ध डायलॉग सादर केला. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, का इंग्लिशमध्ये सांगू’ असे म्हणत तिने निरोप घेतला. यावेळी तरुणार्इंनी एकच जल्लोष केला.