शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'या' तीन बाबींमुळे मराठा आरक्षण लढ्याचा विजय मोठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 12:15 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य पातळीवर आरक्षणाच्या मुद्दावर निर्माण झालेली जटीलता काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता आले आहे.

मुंबई - तब्बल २५ वर्षांच्यापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाची लढाई मराठा समाजाने काही अंशी जिंकली. या लढाईत सर्वसामान्य मराठा सहभागी झाल्यामुळे ही लढाई जिंकण्यास मदतच झाली आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजातील अनेक संघटना आरक्षणाचा पाठपुरावा करत होत्या. त्यात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर यश आले. या आरक्षणाच्या लढाईत संघटना, राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्यासह सर्वसामान्य मराठा समाज सहभागी होता. या लाभ मराठा समाजातील दुर्बल घटकांना होणार हे नक्की.

२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने मराठा आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, वेळीच त्यावर पावले उचलले गेली नसल्याने मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. त्यामुळे लाखोंचे मराठा मोर्चे निघाले. कालातंराने या मोर्चांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. रस्त्यावरची लढाई लढत असताना मराठा समाजातील अनेकांनी सरकारच्या साथीत न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडली. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासंदर्भातील निर्णय देण्यास मदतच झाली.

न्यायालयाच्या निर्णयातील तीन बाबी मराठा आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण ठरल्या. पहिली म्हणजे, न्यायालयात आरक्षण देण्याचा सरकारचा अधिकार वैध ठरणे, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण अपवादात्मक स्थितीत देता येते हे मान्य होणे, अर्थात तामिळनाडूमध्ये देण्यात आले आहे. आणि तिसरी म्हणजे मराठा समाजाच्या मागासलेपणावर आयोगाने शिक्कामोर्तब करणे होय. या तीन बाबींमुळे मराठा आरक्षणाचा निर्णय मजबूत झाला आहे.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य पातळीवर आरक्षणाच्या मुद्दावर निर्माण झालेली जटीलता काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता आले आहे.