शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोठा दुवा निखळला; ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:40 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदार, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदार, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल मोठा दुवा निखळला, अशा भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.संघर्षमय प्रवास पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन झगडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दु:ख झाले. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक मोठा दुवा निखळला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीएक लढवय्या पत्रकार गमावलामहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत अशा एका प्रदीर्घ कालखंडाचे दिनू रणदिवे हे सजग साक्षीदार होते. आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून त्यांनी गरीब व उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा दशकांमध्ये रणदिवे यांनी राज्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा इतिहास रणदिवे यांच्या गौरवशाली योगदानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लढवय्या पत्रकार गमावला आहे.- भगतसिंह कोश्यारी, राज्यपालमहाराष्ट्र लढवय्या पत्रकाराला मुकलागोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा लढ्यांमध्ये प्रत्यक्षात सहभागी होत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हा लढा पेटवत ठेवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रणदिवे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लढवय्या पत्रकाराला मुकला आहे.- जयंत पाटील, मंत्री,प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेसपत्रकारांसाठी होते दीपस्तंभज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक रणदिवे यांच्या निधनाने आपण एक ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार गमावला आहे. रणदिवे यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. गोवा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पत्रकारांसाठी ते एक दीपस्तंभच होते. त्यांनी दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी आवाज उठवला. दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रणदिवे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री,अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीआंबेडकरी चळवळीने मार्गदर्शक गमावलादिनू रणदिवे हे पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. गाढे अभ्यासक, मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ऐतिहासिक साक्षीदार अभ्यासक आणि आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा हरपला आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगारांचे लढे यांचे वार्तांकन केले. त्यांच्या पत्रकारितेचा वसा हा वंचित-शोषित घटकांना, उपेक्षित वर्गाला, श्रमिकांना न्याय मिळवून देणारा होता. माझे नेतृत्व घडविण्यात दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या निधनाने केवळ पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली नसून आंबेडकरी चळवळीने सच्चा मित्र गमावला आहे.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षबांगलादेश युद्धाचे वार्तांकन करणारे पहिले मराठी पत्रकार‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’चे संपादक म्हणून दिनू रणदिवे यांनी तुरुंगवास भोगला. बांगलादेश युद्धाचे वार्तांकन करणारे ते पहिले मराठी पत्रकार होते. १९७३ च्या रेल्वे संपातले दिनू रणदिवे यांचे वार्तांकन अजोड होते. त्यांच्या लेखामुळे शिवसेनेच्या पहिल्या हल्ल्याचा अनुभव मला मिळाला. अंतुलेंचा सिमेंट भ्रष्टाचार शौरी यांच्याआधी त्यांनी चव्हाट्यावर आणला.- निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार