शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वर्सोवा बीच स्वच्छतेसाठी प्लास्टिक उत्पादक संघटनेची साथ

By admin | Updated: April 16, 2017 21:05 IST

मुंबईतील समुद्रकिना-यांची दयनीय अवस्था झाली असून, किना-यांवर जमा होणा-या कचरा आणि प्लास्टिकमुळे मुंबईतील समुद्रकिनारे हे जणू कचराकुंड्या झाल्या

मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - मुंबईतील समुद्रकिना-यांची दयनीय अवस्था झाली असून, किना-यांवर जमा होणा-या कचरा आणि प्लास्टिकमुळे मुंबईतील समुद्रकिनारे हे जणू कचराकुंड्या झाल्या आहेत. त्यामुळे मासेमारीवर देखील परिणाम झाला असून कोळी बांधवांच्या जाळ्यात माश्यांच्या ऐवजी प्लास्टिक आणि कचरा सापडत असल्याचे चित्र आहे. मात्र लोकसहभागातून हे चित्र बदलले जात असल्याचे वर्सोवा बीचने जगाला दाखवून दिले. देशाला अभिमान वाटावा आणि युनायटेड नेशनच्या पर्यावरण प्रमुखांनी गौरवलेल्या वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटर्स(व्हीआरव्ही)च्या वर्सोवा बीच क्लिनिंग मोहिमेला जून 2015 पेशाने वकील असलेल्या अफरोज शहा यांनी सुरुवात केली. जागतिक पातळीवर या मोहिमेची दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती वेसावे येथील एमबीएचा विद्यार्थी मोहित रामले यांनी दिली, आज या स्वच्छता मोहिमेचा 80 वा सप्ताह होता. गेली 79 आठवडे दर शनिवारी आणि रविवारी ही मोहीम येथे सुरू आहे. या मोहिमेचे शिल्पकार अफरोज शहा आणि त्यांचे 200 कार्यकर्ते मुंबई महापालिकेच्या सहकार्याने वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत. वेसावे कोळीवाड्यातील कोळी बांधवांचे या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य मिळाले आहे. आतापर्यंत येथील बीचवरून ५० लाख किलो कचरा काढण्याचा विक्रम केल्याची माहिती या मोहिमेत सहभागी असलेले वेसाव्याचे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी दिली. वर्सोवा बीच स्वच्छता मोहिमेला आता ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए)या संघटनेची साथ मिळाली आहे. गेल्या रविवारपासून या संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून खास बीचवरील कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टर आणि 9 कामगार उपलब्ध करून दिले आहे. तर सुरुवातीपासूनच या मोहिमेला पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पालिकेच्या के पश्चिम विभागाने मोलाचे सहकार्य केले असून, यांनी पालिकेकडून 1 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 18 कामगार उपलब्ध करून दिली असल्याची दिली.आज सकाळी या ट्रॅक्टरचे उद्घाटन आज सकाळी अखिल भारतीय प्लास्टिक मॅन्युफॅक्चररच्या ट्रॅक्टरचा शुभारंभ मच्छलीमार येथे वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर, के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर, वर्सोवा प्रभाग क्रमांक 59च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटर्स(व्हीआरव्ही)चे अफरोज शहा, पालिकेच्या के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, हिरेन संघवी, अभिनेत्या पूजा बेदी, निर्माते सुभाष घई इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी समुद्रकिनारी ३० नारळाची मोठी झाडे लावण्यात आली. या मान्यवरांसह व्हीआरव्ही चे कार्यकर्ते, के पश्चिम विभागाचे कर्मचारी आणि एआयएमएचे ८ कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी या बीच स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन सुमारे १०००० किलो कचरा काढला, अशी माहिती अफरोज शहा यांनी दिली. तर येथील 2.8 किमी बीचवर जमा होणारे प्लास्टिकचे आणि इतर कचराजन्य पदार्थांचे रिसायकलिंग करण्याचा आमचा मनोदय असल्याचे एआयपीएमएचे या संघटनेचे हरेन संघवी आणि पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अखिलेश भार्गव यांनी सांगितले.