शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुरुत्वीय लहरींच्या प्रयोगशाळेच्या जागेचा ५ आॅगस्टला फैसला

By admin | Updated: July 27, 2016 19:56 IST

लिगो इंडियाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी औंढा तालुक्यातील जागेची निवड जवळपास निश्चित झाली असून यासाठी १७0 हेक्टर जमिनीची गरज आहे

हिंगोली: लिगो इंडियाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी औंढा तालुक्यातील जागेची निवड जवळपास निश्चित झाली असून यासाठी १७0 हेक्टर जमिनीची गरज आहे. यासाठी ५ आॅगस्ट २0१६ ला औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

भारतीय अणुऊर्जा आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडून लिगो इंडियाची (लेसर इंटर पॅरामीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी) प्रयोगशाळेसाठी मागील एक ते दीड वर्षांपासून शास्त्रज्ञ औंढा तालुक्यातील दुधाळा, गांगलवाडी, काशीतांडा, अंजनवाडा आदी शिवारात अभ्यास करीत होते. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास शक्य असल्याचे त्यांच्या पाहणीत आढळून आले होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार भारतात तीन ठिकाणी अशी पाहणी सुरू होती. त्यापैकी औंढ्याचे ठिकाणी अग्रस्थानी होते. अमेरिकेत ‘हान्सफोर्ड लिविंगस्टर’मध्ये असा अभ्यास करणाऱ्या दोन प्रयोगशाळा अगोदरच अस्तित्वात आहेत. भारतात ही तिसरी प्रयोगशाळा राहणार आहे. या प्रकल्पाची अजून निश्चितीच नसली तरीही अंदाजित तीनशे कोटींपर्यंतचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले जाते.

आतापर्यंत आयुका केंद्राचे तरुण सौरदीप आणि शरद गावकर यांनी या भागात १४ ते १५ वेळा पाहणी केली आहे. तर गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारे फ्रेड बहेजाद अशिरी व फ्रेड्रिक रब हे विदेशी शास्त्रज्ञही येथे येवून गेले आहेत. परमाणु ऊर्जा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या पत्रानुसार विभागीय आयुक्तांनी ५ आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली. या पत्रात १७0 हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे. तर जागा अंतिम झाल्यास ती उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

२ आॅगस्टला पथक येणार२ आॅगस्टला पुन्हा एकदा आयुकाचे पथक पाहणीस येणार आहे. भौतिक व निवास सुविधा आदी बाबींवर जिल्हा प्रशासनाशी चर्चा होणार आहे. अजूनही यात बऱ्याच बाबी स्पष्ट होणे बाकी असल्याचे शरद गावकर यांनी सांगितले.

औंढ्याचीच जागा का?भूगर्भातील हालचालींच्या नोंदी व ब्रह्मांडातील गुरत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पठार, आवश्यक उंचीतील डोंगर व योग्य भूपृष्ठ असल्याचे निष्कर्ष आहेत. तर १६ किमी परिसरात रेल्वेपटरी नसावी, पुढील १५ वर्षांत तशी शक्यता नसावी, ४ ते ६ किमीपर्यंत वाहतुकीची वर्दळ असू नये, ६0 किमी परिसरात विमानतळ असू नये, किमान २0 किमी परिसर शांत असावा, २00 किमीपर्यंत समुद्रकिनारा नसावा, तर शास्त्रज्ञांना प्रवास सुकर व्हावा एवढ्या अंतरावर विमानतळ असावे आदी निकष आहेत. त्यातील बहुतांश पूर्ण करणारे हे ठिकाण आहे.