शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

गुरुत्वीय लहरींच्या प्रयोगशाळेच्या जागेचा ५ आॅगस्टला फैसला

By admin | Updated: July 27, 2016 19:56 IST

लिगो इंडियाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी औंढा तालुक्यातील जागेची निवड जवळपास निश्चित झाली असून यासाठी १७0 हेक्टर जमिनीची गरज आहे

हिंगोली: लिगो इंडियाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी औंढा तालुक्यातील जागेची निवड जवळपास निश्चित झाली असून यासाठी १७0 हेक्टर जमिनीची गरज आहे. यासाठी ५ आॅगस्ट २0१६ ला औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

भारतीय अणुऊर्जा आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडून लिगो इंडियाची (लेसर इंटर पॅरामीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी) प्रयोगशाळेसाठी मागील एक ते दीड वर्षांपासून शास्त्रज्ञ औंढा तालुक्यातील दुधाळा, गांगलवाडी, काशीतांडा, अंजनवाडा आदी शिवारात अभ्यास करीत होते. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास शक्य असल्याचे त्यांच्या पाहणीत आढळून आले होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार भारतात तीन ठिकाणी अशी पाहणी सुरू होती. त्यापैकी औंढ्याचे ठिकाणी अग्रस्थानी होते. अमेरिकेत ‘हान्सफोर्ड लिविंगस्टर’मध्ये असा अभ्यास करणाऱ्या दोन प्रयोगशाळा अगोदरच अस्तित्वात आहेत. भारतात ही तिसरी प्रयोगशाळा राहणार आहे. या प्रकल्पाची अजून निश्चितीच नसली तरीही अंदाजित तीनशे कोटींपर्यंतचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले जाते.

आतापर्यंत आयुका केंद्राचे तरुण सौरदीप आणि शरद गावकर यांनी या भागात १४ ते १५ वेळा पाहणी केली आहे. तर गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारे फ्रेड बहेजाद अशिरी व फ्रेड्रिक रब हे विदेशी शास्त्रज्ञही येथे येवून गेले आहेत. परमाणु ऊर्जा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या पत्रानुसार विभागीय आयुक्तांनी ५ आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली. या पत्रात १७0 हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे. तर जागा अंतिम झाल्यास ती उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

२ आॅगस्टला पथक येणार२ आॅगस्टला पुन्हा एकदा आयुकाचे पथक पाहणीस येणार आहे. भौतिक व निवास सुविधा आदी बाबींवर जिल्हा प्रशासनाशी चर्चा होणार आहे. अजूनही यात बऱ्याच बाबी स्पष्ट होणे बाकी असल्याचे शरद गावकर यांनी सांगितले.

औंढ्याचीच जागा का?भूगर्भातील हालचालींच्या नोंदी व ब्रह्मांडातील गुरत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पठार, आवश्यक उंचीतील डोंगर व योग्य भूपृष्ठ असल्याचे निष्कर्ष आहेत. तर १६ किमी परिसरात रेल्वेपटरी नसावी, पुढील १५ वर्षांत तशी शक्यता नसावी, ४ ते ६ किमीपर्यंत वाहतुकीची वर्दळ असू नये, ६0 किमी परिसरात विमानतळ असू नये, किमान २0 किमी परिसर शांत असावा, २00 किमीपर्यंत समुद्रकिनारा नसावा, तर शास्त्रज्ञांना प्रवास सुकर व्हावा एवढ्या अंतरावर विमानतळ असावे आदी निकष आहेत. त्यातील बहुतांश पूर्ण करणारे हे ठिकाण आहे.