शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वैदिक हे देशद्रोहीच - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 16, 2014 14:24 IST

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला भेटणरे वेदप्रकाश वैदिक हे देशद्रोहीच आहेत असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे.

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १६ - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला भेटणरे वेदप्रकाश वैदिक हे देशद्रोहीच आहेत अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वैदिक - सईद भेटीवर टीका केली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

भाजप समर्थक आणि योगगुरु बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला होता. या दौ-यात वैदिक यांनी दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेतली होती. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी केली असतानाच बुधवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून या भेटीवर जोरदार टीका केली आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या म्होरक्याला भेटणा-यांना चटके द्यायला पाहिजे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

मंगळवारी केंद्र सरकारने लोकसभेत या भेटीशी सरकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणतात, भारतीय नागरिकांना तुरुंगात डांबून ठार मारणारे पाकिस्तान वैदिक यांच्याशी ऐवढ्या सौजन्याने का वागले. या सर्व प्रकरणाचा गुप्तचर यंत्रणांनी शोध घ्यायला हवा. केंद्र सरकारनेही या प्रकरणावरुन हात न झटकता प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधिंतांवर कारवाई करावी. केंद्र सरकारने कारवाई केली नाही तर उद्या कोणीही जाऊन दाऊद, टायगर मेमन यांच्यासोबत बिर्याणी खाऊन येईल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.