शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अनधिकृत बांधकामास जबाबदार नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 20:09 IST

मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासला आहे. ही कारवाई निर्दयी असून झोपडी वासियांचे पुनर्वसन करा तसेच या बांधकामांना जबाबदार नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली आहे.  त्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

काशीमीराच्या माशाचा पाडा मार्गावरील महापालिका मालकीच्या उद्यान व रस्ता आरक्षण मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन पक्की व कच्ची बेकायदेशीर बांधकामे झाली होती. शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील सुमारे ३०० कच्ची - पक्की अनाधिकृत बांधकामे पालिकेने तोडून टाकली होती. पालिकेच्या कारवाई नंतर बेघर झालेले झोपडीवासी त्याच ठिकाणी आपले बिर्‍हाड मांडून बसले. शनिवारी उर्वरित बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिका पथक जाणार होते. पण राजकीय हस्तक्षेप व पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण सूत्रांनी सांगत कारवाई केली गेली नाही.

दरम्यान  सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे मीरा भाईंदर अध्यक्ष सलीम खान यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  पालिका प्रवेशद्वारा बाहेर धरणे धरत कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महापालिका व स्थानिक भाजपा नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

महापालिकेची जागा होती तर त्यामध्ये बांधकामे झाली कशी ? या बांधकामांना कर आकारणी, पाणी,  वीज आदी सुविधा पालिकेने दिल्या होत्या. इतके होई पर्यंत नगरसेवक व अधिकारी झोपा काढत होते का ? याच्या मुळे गोरगरीब बेघर झाले व त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी तसेच कर आकारणी, पाणी व वीज देणारे आदींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंचितचे शहर अध्यक्ष सलीम खान, प्रवक्ते महेंद्र चाफे, महिला अध्यक्षा मीना सोरटे, रंजना भगत, अनिल भगत आदींनी केली आहे. 

बेघर केलेल्याचे पालिकेने पुनर्वसन करावे . जय बजरंग नगर चे शौचालय पालिकेने काढले त्यावर उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृहनेते प्रशांत दळवी व स्थानिक भाजपा नगरसेवकांनी मानवताचा हवाला दिला होता. मग आता तर शेकडो लोकांचे संसार उध्वस्त करून सत्ताधारी भाजपाने मानवतावाद दाखवला आहे का ? अशी टीकेची झोड वंचितच्या आंदोलकांनी उठवली आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर