शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अनधिकृत बांधकामास जबाबदार नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 20:09 IST

मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासला आहे. ही कारवाई निर्दयी असून झोपडी वासियांचे पुनर्वसन करा तसेच या बांधकामांना जबाबदार नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली आहे.  त्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

काशीमीराच्या माशाचा पाडा मार्गावरील महापालिका मालकीच्या उद्यान व रस्ता आरक्षण मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन पक्की व कच्ची बेकायदेशीर बांधकामे झाली होती. शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील सुमारे ३०० कच्ची - पक्की अनाधिकृत बांधकामे पालिकेने तोडून टाकली होती. पालिकेच्या कारवाई नंतर बेघर झालेले झोपडीवासी त्याच ठिकाणी आपले बिर्‍हाड मांडून बसले. शनिवारी उर्वरित बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिका पथक जाणार होते. पण राजकीय हस्तक्षेप व पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण सूत्रांनी सांगत कारवाई केली गेली नाही.

दरम्यान  सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे मीरा भाईंदर अध्यक्ष सलीम खान यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  पालिका प्रवेशद्वारा बाहेर धरणे धरत कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महापालिका व स्थानिक भाजपा नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

महापालिकेची जागा होती तर त्यामध्ये बांधकामे झाली कशी ? या बांधकामांना कर आकारणी, पाणी,  वीज आदी सुविधा पालिकेने दिल्या होत्या. इतके होई पर्यंत नगरसेवक व अधिकारी झोपा काढत होते का ? याच्या मुळे गोरगरीब बेघर झाले व त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी तसेच कर आकारणी, पाणी व वीज देणारे आदींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंचितचे शहर अध्यक्ष सलीम खान, प्रवक्ते महेंद्र चाफे, महिला अध्यक्षा मीना सोरटे, रंजना भगत, अनिल भगत आदींनी केली आहे. 

बेघर केलेल्याचे पालिकेने पुनर्वसन करावे . जय बजरंग नगर चे शौचालय पालिकेने काढले त्यावर उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृहनेते प्रशांत दळवी व स्थानिक भाजपा नगरसेवकांनी मानवताचा हवाला दिला होता. मग आता तर शेकडो लोकांचे संसार उध्वस्त करून सत्ताधारी भाजपाने मानवतावाद दाखवला आहे का ? अशी टीकेची झोड वंचितच्या आंदोलकांनी उठवली आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर