शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात कुणा-कुणाला मिळणार 'वंचित'चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 12:52 IST

युती आणि आघाडीमुळे चित्र बदलले असले तरी वंचितने २८८ जागा लढविल्यास, सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारीपासून वंचित असलेल्या नेत्यांना 'वंचित'चा आधार मिळणार हे मात्र निश्चित.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची चर्चा थांबली असली तरी या निवडणुकीतील भाजपचा मोठा विजय राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारा ठरेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या चारही प्रमुख पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. यावेळी राज्यातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राहणार असून या आघाडीमुळे अनेक राजकीय वंचितांना आधार मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये स्वबळावर लढणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना ऐनवेळी उमेदवारांसाठी धावाधाव करावी लागली होती. अनेक ठिकाणी मिळेल त्याला उमेदवारी देण्यात आली. यावेळी मात्र स्थिती बदलली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजप-शिवसेना टोकाच्या अंतर्गत कलहानंतरही एकत्र लढतील, असाच अंदाज आहे. गेल्यावेळी स्वतंत्र आणि आता युती करून लढणाऱ्या पक्षांसमोर यावेळी उमेदवारी देण्यावरून मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सहाजिकच बंडखोरांची संख्या वाढणार आहे. या स्थितीसाठी राजकीय पक्षांना तयार राहावे लागणार आहे. त्याचवेळी वंचितला उमेदवार शोधण्यासाठी फारशी कसरत करावी लागणार नाही हे देखील तेवढंच खरं आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीत आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे पक्षांतर पाहायला मिळाले होते. त्यावेळी राजकीय पुढाऱ्यांचा पक्षांतराचा सुरू झालेला धडका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. एवढच काय तर अखेरच्या अधिवेशनात सरकारने पक्षात सामील झालेल्या दोन बड्या नेत्यांना मंत्रीपदे दिलीत. परंतु, या पक्षांतराच्या खेळात अनेक नेते अडचणीतही सापडले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. त्यावेळी उभय पक्षांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. त्यातच शिवसेनेने अनेकदा सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली होती. परिणामी २०१९ विधानसभा निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना स्वतंत्रच लढणार असा अंदाज अनेक नेत्यांनी बांधला. त्यानुसार त्या नेत्यांनी पक्षांतर केले. मात्र आता युती, आघाडी होणार हे निश्चित असल्याने अनेक नेत्यांची अडचण होणार आहे. परंतु, अशा स्थितीत सापडलेल्या नेत्यांना नव्याने उदयास आलेली मुस्लीम-दलितांची वंचित बहुजन आघाडी पर्याय म्हणून समोर येण्याची शक्यता आहे.

वंचितने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणाऱ्या वंचितला अनेक ठिकाणी उमेदवारांची कमतरता भासली होती. परंतु, विधानसभेला तशीच स्थिती राहिल अशी शक्यता होती. त्यातच युती आणि आघाडीमुळे चित्र बदलले असले तरी वंचितने २८८ जागा लढविल्यास, सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारीपासून वंचित असलेल्या नेत्यांना 'वंचित'चा आधार मिळणार हे मात्र निश्चित.