शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रात वैशाख वणवा; पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 07:47 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैशाख वणव्यामुळे मुंबईसह राज्यभरातील शहरांचे कमाल तापमान चढेच असून, बहुतांशी शहरांनी चाळिशी गाठली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तापला असून, मुंबईचा तर घाम निघत आहे. त्यात आता पुढील पाच दिवसांसाठी राज्यात हवामान कोरडे राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा अहवाल हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

७ ते ११ मे यादरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येईल. ८ ते ११ मे यादरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येईल. दक्षिण हरियाणा व पूर्व राजस्थानमध्ये ९ ते ११ मेदरम्यान उष्णतेची लाट येईल. ८ ते ९ मेदरम्यान पश्चिम मध्य प्रदेश आणि १० ते ११ मेदरम्यान दक्षिण पंजाब व जम्मू येथे उष्णतेची लाट येईल.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

७ ते ११ मेकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

७ ते ११ मेविदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.

कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाटअमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात