शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे छळवणूक प्रकरण : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 16:47 IST

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सांगली, दि. 31 -  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रा. स्वामी यांच्यावर विद्यार्थ्यांची छळवणूक, विद्यार्थिंनीशी वाईट वागणूक, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात प्रा. स्वामी यांच्यावर छळाचा आरोप करुन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

गेल्या आठवड्यात दिगंबर भांगे या मेकॅनिकल विभागाच्या तिस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होतो. ‘अपलाईड थर्मो डायनॅमिक्स’ या विषयात तो नापास झाला होता. या विषयाचे प्राध्यापक व्ही. बी. स्वामी यांच्या दडपणामुळेच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी एक दिवस मॅकेनिकल विभागावर बहिष्कार टाकून प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

या घटनेची दखल घेत संचालक डॉ. परिशवाड यांनी विद्यापीठ अधिनियमानुसार चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सम्यक विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, अनिकेत भंडारे, प्रसन्नजित एरंडोलीकर, रोहन बनसोडे, प्रतिक विटेकर, ऋषभ वडगावे, प्रथमेश भोसले, प्रसन्नजीत कांबळे आदींनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख व संचालकांना निवेदन देऊन प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.अखेर संचालक परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परिशवाड म्हणाले की, प्रा. स्वामी यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कारवाई  केली आहे. या तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे सांगितले.  प्राध्यापकावर गंभीर आरोपमेकॅनिकल विभागात  सहाय्यक प्राध्यापक असलेले स्वामी हे चार वर्षापूर्वी वालचंद महाविद्यालयात रुजू झाले होते. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निलंबनाची कारवाई करतानाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात विद्यार्थ्यांचा छळ, त्यांना धमकी देणे, विद्यार्थिंनी अवांतर वेळेत केबीनमध्ये बोलावून वाईट वागणूक देणे, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना वारंवार नापास करणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.