शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

विद्यार्थ्यांचे छळवणूक प्रकरण : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 16:47 IST

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सांगली, दि. 31 -  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रा. स्वामी यांच्यावर विद्यार्थ्यांची छळवणूक, विद्यार्थिंनीशी वाईट वागणूक, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात प्रा. स्वामी यांच्यावर छळाचा आरोप करुन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

गेल्या आठवड्यात दिगंबर भांगे या मेकॅनिकल विभागाच्या तिस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होतो. ‘अपलाईड थर्मो डायनॅमिक्स’ या विषयात तो नापास झाला होता. या विषयाचे प्राध्यापक व्ही. बी. स्वामी यांच्या दडपणामुळेच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी एक दिवस मॅकेनिकल विभागावर बहिष्कार टाकून प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

या घटनेची दखल घेत संचालक डॉ. परिशवाड यांनी विद्यापीठ अधिनियमानुसार चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सम्यक विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, अनिकेत भंडारे, प्रसन्नजित एरंडोलीकर, रोहन बनसोडे, प्रतिक विटेकर, ऋषभ वडगावे, प्रथमेश भोसले, प्रसन्नजीत कांबळे आदींनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख व संचालकांना निवेदन देऊन प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.अखेर संचालक परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परिशवाड म्हणाले की, प्रा. स्वामी यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कारवाई  केली आहे. या तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे सांगितले.  प्राध्यापकावर गंभीर आरोपमेकॅनिकल विभागात  सहाय्यक प्राध्यापक असलेले स्वामी हे चार वर्षापूर्वी वालचंद महाविद्यालयात रुजू झाले होते. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निलंबनाची कारवाई करतानाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात विद्यार्थ्यांचा छळ, त्यांना धमकी देणे, विद्यार्थिंनी अवांतर वेळेत केबीनमध्ये बोलावून वाईट वागणूक देणे, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना वारंवार नापास करणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.