शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वडाची पाने, कडुलिंबाच्या काडीवर तरला संसार

By admin | Updated: September 8, 2016 02:38 IST

प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते

नरेश पाटील, लोनाडप्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते, याचा वस्तुपाठच भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील सैनिक वसाहतीतील आदिवासी कुटुंबांनी घालून दिला आहे. बकरीचे खाद्य म्हणून मागणी असलेली वडाची पाने आणि दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्यांचा आधार घेत आदिवासींना आधार दिल्याचे वास्तव समोर आले आहे. जंगलाचे राजे म्हणून ज्यांचा गौरव होतो, त्यांना निसर्गानेच कसा आधार दिला, त्याचे प्रातिनिधिक चित्र नीरा सखाराम डाकी यांच्या रु पाने समोर आले आहे.नीरा यांच्या पतीचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबातील कर्ता-कमावता काळाच्या पडद्याआड गेला. पण तीन मुलांच्या भविष्याची जबाबदारी नीरा यांच्या पदरात होती. मग बंदिस्त शेळीपालन करणाऱ्यांना सकस अन्न म्हणून लागणारी वडाची ताजी पाने विकून त्या अर्थाजन करू लागल्या. त्यातून कुटुंबाच्या गरजा भागावण्याचा प्रयत्न करू लागल्या. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिन्यात या पानांचे प्रमाण कमी होई. अशा काळात हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी त्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला, तोही निसर्गातूनच. दात घासण्यासाठी दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या त्यांनी विकण्यास सुरु वात केली. त्यातून त्यांना बारमाही उत्पन्नाचा स्त्रोत गवसला. वडाची पाने आणि कडुलिंबाच्या झाडाच्या काड्यांवर त्यांनी मुलांचे शिक्षण आणि लग्न कार्याची जबाबदारी पार पाडली. नीरा यांच्यासोबत कल्पना बाळाराम जाधव आणि इतर अनेक मंडळी पावसाळ््यात भिवंडी तालुक्यातील दिघाशी, मांडोशी, कूंदे, करमाले, दाभाड, किरवली, शेडगांव, सोनटक्के, कवाड, विश्वभारती आदी गाव-पाड्यातील जंगल, माळरानातून वडाच्या झाडांची पाने जमा करतात. ती एकत्र करून भिवंडीला आमपाडा येथील बकरी बाजारात विकतात. त्यातून त्यांना आपल्या संसाराचा गाडा रेटता येतो. भरपावसात तुडवतात जंगल अंदाजे १०० पानांच्या जुडीला पानाच्या आकारानुसार दोन, पाच किंवा दहा रूपये असा दर मिळतो. तसा तो मिळाला तर दिवसाकाठी १०० ते ५०० रूपयांची कमाई होते. पण या पैशांसाठी माळरानी, जंगलात हव्या तशा वडाच्या पानांचा शोध घेत फिरावे लागते. ऐन पावसातील खडतर प्रवास, साप, विंचवाची तमा न बाळगत जीव जोखमीत घालून पाने जमवावी लागतात, अशी माहिती कल्पना जाधव यांनी दिली. प्रचंड कष्टानेच दिला आधारपतीच्या निधनानंतर माझ्यासह तीन मुलांच्या उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा होता. त्यातूनच मग वडाची पाने कडुलिंबाच्या काड्यांचा आधार मिळाल. कडुलिंबाची पाच ते सहा इंचाची एक काडी दोन ते पाच रु पये दराने विकली गेली आणि वडाच्या पानांची सोबत असली तर दिवसाकाठी २०० ते ५०० रूपये मिळू शकतात. पण त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. तसा हिशेब ठेवत वर्षभर काम केले तरच कुटुंबाचा गाडा हाकता येतो, असे नीरा यांनी सांगितले.