शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

वडाची पाने, कडुलिंबाच्या काडीवर तरला संसार

By admin | Updated: September 8, 2016 02:38 IST

प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते

नरेश पाटील, लोनाडप्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते, याचा वस्तुपाठच भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील सैनिक वसाहतीतील आदिवासी कुटुंबांनी घालून दिला आहे. बकरीचे खाद्य म्हणून मागणी असलेली वडाची पाने आणि दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्यांचा आधार घेत आदिवासींना आधार दिल्याचे वास्तव समोर आले आहे. जंगलाचे राजे म्हणून ज्यांचा गौरव होतो, त्यांना निसर्गानेच कसा आधार दिला, त्याचे प्रातिनिधिक चित्र नीरा सखाराम डाकी यांच्या रु पाने समोर आले आहे.नीरा यांच्या पतीचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबातील कर्ता-कमावता काळाच्या पडद्याआड गेला. पण तीन मुलांच्या भविष्याची जबाबदारी नीरा यांच्या पदरात होती. मग बंदिस्त शेळीपालन करणाऱ्यांना सकस अन्न म्हणून लागणारी वडाची ताजी पाने विकून त्या अर्थाजन करू लागल्या. त्यातून कुटुंबाच्या गरजा भागावण्याचा प्रयत्न करू लागल्या. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिन्यात या पानांचे प्रमाण कमी होई. अशा काळात हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी त्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला, तोही निसर्गातूनच. दात घासण्यासाठी दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या त्यांनी विकण्यास सुरु वात केली. त्यातून त्यांना बारमाही उत्पन्नाचा स्त्रोत गवसला. वडाची पाने आणि कडुलिंबाच्या झाडाच्या काड्यांवर त्यांनी मुलांचे शिक्षण आणि लग्न कार्याची जबाबदारी पार पाडली. नीरा यांच्यासोबत कल्पना बाळाराम जाधव आणि इतर अनेक मंडळी पावसाळ््यात भिवंडी तालुक्यातील दिघाशी, मांडोशी, कूंदे, करमाले, दाभाड, किरवली, शेडगांव, सोनटक्के, कवाड, विश्वभारती आदी गाव-पाड्यातील जंगल, माळरानातून वडाच्या झाडांची पाने जमा करतात. ती एकत्र करून भिवंडीला आमपाडा येथील बकरी बाजारात विकतात. त्यातून त्यांना आपल्या संसाराचा गाडा रेटता येतो. भरपावसात तुडवतात जंगल अंदाजे १०० पानांच्या जुडीला पानाच्या आकारानुसार दोन, पाच किंवा दहा रूपये असा दर मिळतो. तसा तो मिळाला तर दिवसाकाठी १०० ते ५०० रूपयांची कमाई होते. पण या पैशांसाठी माळरानी, जंगलात हव्या तशा वडाच्या पानांचा शोध घेत फिरावे लागते. ऐन पावसातील खडतर प्रवास, साप, विंचवाची तमा न बाळगत जीव जोखमीत घालून पाने जमवावी लागतात, अशी माहिती कल्पना जाधव यांनी दिली. प्रचंड कष्टानेच दिला आधारपतीच्या निधनानंतर माझ्यासह तीन मुलांच्या उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा होता. त्यातूनच मग वडाची पाने कडुलिंबाच्या काड्यांचा आधार मिळाल. कडुलिंबाची पाच ते सहा इंचाची एक काडी दोन ते पाच रु पये दराने विकली गेली आणि वडाच्या पानांची सोबत असली तर दिवसाकाठी २०० ते ५०० रूपये मिळू शकतात. पण त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. तसा हिशेब ठेवत वर्षभर काम केले तरच कुटुंबाचा गाडा हाकता येतो, असे नीरा यांनी सांगितले.