शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

वडाची पाने, कडुलिंबाच्या काडीवर तरला संसार

By admin | Updated: September 8, 2016 02:38 IST

प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते

नरेश पाटील, लोनाडप्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते, याचा वस्तुपाठच भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील सैनिक वसाहतीतील आदिवासी कुटुंबांनी घालून दिला आहे. बकरीचे खाद्य म्हणून मागणी असलेली वडाची पाने आणि दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्यांचा आधार घेत आदिवासींना आधार दिल्याचे वास्तव समोर आले आहे. जंगलाचे राजे म्हणून ज्यांचा गौरव होतो, त्यांना निसर्गानेच कसा आधार दिला, त्याचे प्रातिनिधिक चित्र नीरा सखाराम डाकी यांच्या रु पाने समोर आले आहे.नीरा यांच्या पतीचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबातील कर्ता-कमावता काळाच्या पडद्याआड गेला. पण तीन मुलांच्या भविष्याची जबाबदारी नीरा यांच्या पदरात होती. मग बंदिस्त शेळीपालन करणाऱ्यांना सकस अन्न म्हणून लागणारी वडाची ताजी पाने विकून त्या अर्थाजन करू लागल्या. त्यातून कुटुंबाच्या गरजा भागावण्याचा प्रयत्न करू लागल्या. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिन्यात या पानांचे प्रमाण कमी होई. अशा काळात हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी त्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला, तोही निसर्गातूनच. दात घासण्यासाठी दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या त्यांनी विकण्यास सुरु वात केली. त्यातून त्यांना बारमाही उत्पन्नाचा स्त्रोत गवसला. वडाची पाने आणि कडुलिंबाच्या झाडाच्या काड्यांवर त्यांनी मुलांचे शिक्षण आणि लग्न कार्याची जबाबदारी पार पाडली. नीरा यांच्यासोबत कल्पना बाळाराम जाधव आणि इतर अनेक मंडळी पावसाळ््यात भिवंडी तालुक्यातील दिघाशी, मांडोशी, कूंदे, करमाले, दाभाड, किरवली, शेडगांव, सोनटक्के, कवाड, विश्वभारती आदी गाव-पाड्यातील जंगल, माळरानातून वडाच्या झाडांची पाने जमा करतात. ती एकत्र करून भिवंडीला आमपाडा येथील बकरी बाजारात विकतात. त्यातून त्यांना आपल्या संसाराचा गाडा रेटता येतो. भरपावसात तुडवतात जंगल अंदाजे १०० पानांच्या जुडीला पानाच्या आकारानुसार दोन, पाच किंवा दहा रूपये असा दर मिळतो. तसा तो मिळाला तर दिवसाकाठी १०० ते ५०० रूपयांची कमाई होते. पण या पैशांसाठी माळरानी, जंगलात हव्या तशा वडाच्या पानांचा शोध घेत फिरावे लागते. ऐन पावसातील खडतर प्रवास, साप, विंचवाची तमा न बाळगत जीव जोखमीत घालून पाने जमवावी लागतात, अशी माहिती कल्पना जाधव यांनी दिली. प्रचंड कष्टानेच दिला आधारपतीच्या निधनानंतर माझ्यासह तीन मुलांच्या उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा होता. त्यातूनच मग वडाची पाने कडुलिंबाच्या काड्यांचा आधार मिळाल. कडुलिंबाची पाच ते सहा इंचाची एक काडी दोन ते पाच रु पये दराने विकली गेली आणि वडाच्या पानांची सोबत असली तर दिवसाकाठी २०० ते ५०० रूपये मिळू शकतात. पण त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. तसा हिशेब ठेवत वर्षभर काम केले तरच कुटुंबाचा गाडा हाकता येतो, असे नीरा यांनी सांगितले.