शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर; तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:33 IST

या परिसंवादात कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते

अलिबाग - शेतकरी शेतात नवे-नवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवत असतात. मात्र, कृषी विद्यापीठाकडे याची माहिती नसते. कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. कृषी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे. तंत्रज्ञानामध्ये आपण मागे आहोत. शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ए. आय. तंत्रज्ञान पोहोचविण्याचा मानस असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. 

अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती भवनात कोकण विभागीय प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी यांचा परिसंवाद कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून १० फेब्रुवारी रोजी आयोजिला होता. 

प्रगतिशील शेतकरी परिसंवादात सहभागी या परिसंवादात कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते. समारोपाप्रसंगी कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या, प्रश्नाचे निरसन मंत्री कोकाटे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कृषी सह. संचालक अंकुश माने, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे, अनिल पाटील, आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते.

मांडल्या समस्यापरिसंवादात आंबा, काजू, नारळ, चिकू, फणस, सुपारी,  भात उत्पादक शेतकरी, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी अनेक सूचना मांडल्या. विविध योजनांची थकीत अनुदाने, खतांचे लिंकिंग, पीकविमा, पायाभूत आणि काढणीपश्चात सुविधांचा अभाव, पीकनिहाय अडीअडचणी, पीक क्लस्टर आदी महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हाने, समस्या यावेळी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या. 

चार तास चालली बैठकचार तास चाललेल्या या बैठकीत कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. ज्या ठिकाणी बदल शक्य आहेत, त्या विभागाशी चर्चा करून सुधारणा करण्यात येईल. तसेच ज्या योजना किंवा धोरणे केंद्र सरकारशी संबंधित आहेत, त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस व पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रManikrao Kokateमाणिकराव कोकाटे