शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मंत्र्यांच्या कामगिरीचा लोकसभेसाठी वापर; भाजपाची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 02:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून भाजपा राज्यातील आपल्या प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा उपयोग करून घेत आहे. एकेका मंत्र्याने त्यांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून भाजपा राज्यातील आपल्या प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा उपयोग करून घेत आहे. एकेका मंत्र्याने त्यांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.त्या अंतर्गत ग्रामविकास व महिला- बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पत्रपरिषद घेऊन दोन्ही विभागाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात आले. १६ हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.ग्रामीण भागातील ३५ हजार घरांची अतिक्रमणे विनाशुल्क नियमित करण्यात आली. इतर नाममात्र शुल्क आकारून नियमित केली जात आहेत. त्यामुळे हजारो लोकांची घरे त्यांच्या हक्काची झाली, असे त्या म्हणाल्या.सरपंचांची थेट निवडणूक सुरू केल्याने ग्रामीण भागात नेतृत्व उभे झाले. युवकांचा राजकारण, समाजकारणातील सहभाग वाढला. २८ हजार ग्रामपंचायतीत थेट सरपंच झाले, अशी माहिती त्यांनी दिली.मातोश्री ग्रामपंचायत योजनेंतर्गत हजारो ग्रामपंचायतींना स्वत:ची कार्यालये मिळाली, हजारो महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज मिळाले, अंगणवाडी सेविकांचे मानधन तर वाढविलेच; शिवाय ते थेट बँक खात्यात देणे सुरू केले, माझी कन्या भाग्यश्री योजनेने मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली.ग्रामीण भागात घरेप्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात ७ लाख २२ हजार घरे बांधण्यात आली. तसेच मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायतींना कार्यालये मिळाली.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक