शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर

By admin | Updated: April 28, 2016 03:48 IST

शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे.

आकाश गायकवाड,

डोंबिवली-शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे. आंबा, सफरचंद, अननस, चिकू, खरबूज आदी फळांचा ज्यूस ते १० रुपयांत विकत आहेत. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु,ज्यूससाठी फळांऐवजी रंग आणि स्वादाचा वापर होत आहे. त्याचेप्रमाण अधिक असल्याचे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाचे अशा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे.वाढत्या तापामानामुळे लाहीलाही होत आहे. त्यावर मात करण्यासाठी थंड पेये व पदार्थांना मोठी मागणी आहे. सध्या शहरातील चौकाचौकांतील आणि रेल्वेस्थानका बाहेरील हातगाडीचालकांकडे १० ते १५ रुपयांत ज्यूस विकत आहेत. घशाची कोरड भागवण्यासाठी नागरिक हमखास फळांचे रस, गोळा सरबत आणि लिंबू सरबत त्यांच्याकडे पिताना दिसतात. नागरिकही ‘स्वस्त आणि मस्त’ असा विचार करून आर्वजून या सरबतांचा आस्वाद घेतात. मात्र, सरबतासाठी वापरले जाणारे पाणी शौचालय, अन्य ठिकाणच्या दूषित पाण्याचा अथवा बोअरवलचा वापर केला जात आहे. तसेच साखरेपेक्षाही कैक पटींनी गोड असणाऱ्या सॅक्रि नच्या द्रव्याचा वापर सरबत गोड बनवण्यासाठी केला जातो. सरबतासाठी वापरला जाणारा बर्फतर घाणीत कुठेही ठेवला जातो. त्यामुळे बोअरवेलच्या किंवा दूषित पाण्याची चव अथवा रंग समजत नाही. कधीकधी सरबत बनवण्यासाठी लागणारे लिंबू निकृष्ट दर्जाचे, डागळलेले आणि खराबही असतात. ज्यूस रंग आणि रसायनयुक्त स्वाद वापरला जातो. कारण ज्यूसविक्रेते कधीही प्रत्यक्षात फळे वापरताना दिसत नाहीत. त्यांच्या मिक्सरमध्ये अगोदरच दूध व त्यात फळाचा स्वाद व रंग टाकून कृत्रिम ज्यूस बनवून ठेवला जातो. फळांचा अर्कलागावा म्हणून खरबूज किंवा कलिंगडाचे तुकडे त्यात टाकले जातात. आंब्याचा हंगाम असला तरी बाजारात पुरेशी आवक झालेली नाही. त्यामुळे एक डझन आंबे किमान ४०० ते ५०० रुपयांना मिळत आहेत. मग १० ते १५ रुपयांत ज्यूस विकण्यासाठी विक्रेते खरबुजाचा वापर करतात. त्यात आंबा आणि अन्य फळांचा स्वाद टाकतात. परंतु, दूषित पाणी आणि हानिकारक रसायनांमुळे ज्यूस प्यायल्यास गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया, टायफॉइड, यासांरख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशा हातगाड्यांवर ज्यूस व लिंबू सरबत आवडीने पिणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.