शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर

By admin | Updated: April 28, 2016 03:48 IST

शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे.

आकाश गायकवाड,

डोंबिवली-शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे. आंबा, सफरचंद, अननस, चिकू, खरबूज आदी फळांचा ज्यूस ते १० रुपयांत विकत आहेत. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु,ज्यूससाठी फळांऐवजी रंग आणि स्वादाचा वापर होत आहे. त्याचेप्रमाण अधिक असल्याचे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाचे अशा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे.वाढत्या तापामानामुळे लाहीलाही होत आहे. त्यावर मात करण्यासाठी थंड पेये व पदार्थांना मोठी मागणी आहे. सध्या शहरातील चौकाचौकांतील आणि रेल्वेस्थानका बाहेरील हातगाडीचालकांकडे १० ते १५ रुपयांत ज्यूस विकत आहेत. घशाची कोरड भागवण्यासाठी नागरिक हमखास फळांचे रस, गोळा सरबत आणि लिंबू सरबत त्यांच्याकडे पिताना दिसतात. नागरिकही ‘स्वस्त आणि मस्त’ असा विचार करून आर्वजून या सरबतांचा आस्वाद घेतात. मात्र, सरबतासाठी वापरले जाणारे पाणी शौचालय, अन्य ठिकाणच्या दूषित पाण्याचा अथवा बोअरवलचा वापर केला जात आहे. तसेच साखरेपेक्षाही कैक पटींनी गोड असणाऱ्या सॅक्रि नच्या द्रव्याचा वापर सरबत गोड बनवण्यासाठी केला जातो. सरबतासाठी वापरला जाणारा बर्फतर घाणीत कुठेही ठेवला जातो. त्यामुळे बोअरवेलच्या किंवा दूषित पाण्याची चव अथवा रंग समजत नाही. कधीकधी सरबत बनवण्यासाठी लागणारे लिंबू निकृष्ट दर्जाचे, डागळलेले आणि खराबही असतात. ज्यूस रंग आणि रसायनयुक्त स्वाद वापरला जातो. कारण ज्यूसविक्रेते कधीही प्रत्यक्षात फळे वापरताना दिसत नाहीत. त्यांच्या मिक्सरमध्ये अगोदरच दूध व त्यात फळाचा स्वाद व रंग टाकून कृत्रिम ज्यूस बनवून ठेवला जातो. फळांचा अर्कलागावा म्हणून खरबूज किंवा कलिंगडाचे तुकडे त्यात टाकले जातात. आंब्याचा हंगाम असला तरी बाजारात पुरेशी आवक झालेली नाही. त्यामुळे एक डझन आंबे किमान ४०० ते ५०० रुपयांना मिळत आहेत. मग १० ते १५ रुपयांत ज्यूस विकण्यासाठी विक्रेते खरबुजाचा वापर करतात. त्यात आंबा आणि अन्य फळांचा स्वाद टाकतात. परंतु, दूषित पाणी आणि हानिकारक रसायनांमुळे ज्यूस प्यायल्यास गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया, टायफॉइड, यासांरख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशा हातगाड्यांवर ज्यूस व लिंबू सरबत आवडीने पिणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.