शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
4
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
5
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
6
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
7
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
8
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
9
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
10
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
11
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
12
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
13
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
14
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
15
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
16
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
17
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
18
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
19
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
20
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!

मुलींवर झाले उपनयन संस्कार

By admin | Updated: August 17, 2016 21:38 IST

मुलांचे उपनयन संस्कार करणे, हे सर्वांना परिचित आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 17 - मुलांचे उपनयन संस्कार करणे, हे सर्वांना परिचित आहे. परंतू मुलींवर सामूहिक उपनयन संस्कार करण्याचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील गारखेडा परिसर येथील आर्य समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ३० मुली आणि ७ मुलांवर या कार्यक्रमात उपनयन संस्कार करण्यात आले. खूप पुर्वी मुलींवर उपनयन संस्कार करण्याची पद्धत प्रचलित होती. याशिवाय उपनयन संस्कार हा केवळ ह्यब्राह्मणह्ण समाजापुरता मर्यादित नसून तो ह्यहिंदूह्ण लोकांचा संस्कार आहे. स्त्री असो अथवा पुरूष प्रत्येक ह्यहिंदू ह्णला तो करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे सामाजिक समता येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. याच तत्त्वाला अनुसरूण या कार्यक्रमात ब्राह्मण समाजापेक्षा इतर समाजातील बालिकांचे प्रमाण अधिक आढळून आले. महाराष्ट्रात दिड हजार वर्षांनंतर प्रथमच मुलींवर सामुहिक उपनयन संस्कार करण्यात आले असून शहरात हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याचे प्रा. रमेश पांडव यांनी सांगितले. शहरवासीयांसाठी तर ही घटना अगदीच नविण्यपुर्ण आहे. यामध्ये ह्यसंजापाह्ण (मुंज या सोहळ्यातील केस कापण्याचा विधी) हा विधी सोडून वैदिक पद्धतीने मुलींची मुंज लावण्यात आली. या कार्यक्रमाचे पौरोहित्यदेखील एका महिला विदुषीने केले. आचार्या नंदिता शास्त्री चतुर्वेदी या खास वाराणसी येथून या कार्यक्रमासाठी शहरात आल्या होत्या. त्यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रा. रमेश ठाकूर, डॉ. लक्ष्मण माने, प्रविण माळी, ज्योती तोष्णीवाल, माधव शास्त्री, प्रतिभा शिंदे, महिपाल व्यवहारे, डॉ. सुजाता क रजगावकर, मंगलमुर्ती शास्त्री , अर्चना गणगे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स्वस्तीवचन, शांतीकरणम, मेखला बंधन, संध्या वंदन, गायत्री मंत्राचा उपदेश, आर्शिवचन, आणि हवन असे विधी या संस्कारात समाविष्ठ आहेत. सोळा संस्कारांपैकी एक असणारा उपनयन संस्कार झाल्यानंतर प्रत्येकाला तीन धागे असलेले यज्ञोपवीत (जाणवे) देण्यात आले. या संस्कारानंतर ती व्यक्ती माता-पिता ऋण, गुरू ऋण आणि समाज ऋण फेडण्याचा अधिकारी झाला आहे, असे समजण्यात येते. आचार्या नंदिता शास्त्री यांनी बालिकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की मुलींना उपनयन संस्काराचे अधिकार आहेत, याचे दाखले प्रत्येक वेदात आढळून येतात. नंदिता शास्त्री या वाराणसी येथील वेद विद्यालयाच्या प्रधान असून त्यांना चारही वेद मुखोद्गत आहेत. पांढऱ्या रंगाची वेशभुषा करून अत्यंत साधेपणाने बालिका या सोहळ्यासाठी तयार झाल्या होत्या.