शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्ष एकत्र यावा ही कालपर्यंत भूमिका होती, पण आता.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 14:12 IST

मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु ते राष्ट्रवादीला, शरद पवारांना सोडण्यास तयार नव्हते असं रामदास कदमांनी सांगितले.

मुंबई - माझ्यासह माझ्या मुलाला मूळासकट राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष एकत्र व्हावा अशी कालपर्यंत माझी भूमिका होती. परंतु आता ती बदलली. आदित्य ठाकरेंची विधानं ऐकून माझे मत बदलले. गद्दार कोण? ही क्रांती, उठाव झाला त्याची जगभरात चर्चा झाली. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कुणी केली? याचं आत्मपरिक्षण करणार का? असा घणाघात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेत हे घडत असताना योगेशनं वर्षावर असताना सांगितले माझ्या वडिलांना फोन करून बोलवा तेव्हा काहीजणांनी गरज नाही असं सांगितले. सिद्धेशच्या मोबाईलवर वरूण सरदेसाईंचा फोन आला होता. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला सोडावं असा निरोप दिला. परंतु उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीला सोडण्याची मानसिकता नाही असं मला सांगण्यात आले. तेव्हा यापुढे मला फोन करू नका असं म्हटलं. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु ते राष्ट्रवादीला, शरद पवारांना सोडण्यास तयार नव्हते असं त्यांनी सांगितले.

मोठी बातमी! रामदास कदम आणि राज ठाकरेंची फोनवरून चर्चा; लवकरच भेट होणार 

तसेच पक्ष आपल्याला चालवायचा आहे. शरद पवार हे शिवसेना चालवणार नाही. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून जे साध्य करायचे ते केले. शिवसेना फोडायचं, संपवायचं काम शरद पवारांनी केले. कोकणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतले. मी याबाबत पत्र उद्धव ठाकरेंना दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री आमचे, पैसा शासनाचा आणि शिवसेना फोडण्यासाठी निधीवाटप शरद पवारांनी केले असा आरोप रामदास कदमांनी केला. 

मुंबईत मराठी टक्का कमी का झाला?२५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. २५ वर्षापूर्वी किती मराठी माणूस शिल्लक होता आणि आता किती आहे? मराठी टक्का कमी झाला. आम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचं उत्तर आमच्यासह द्यायला हवं. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना होती. महापालिकेच्या कामात आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना