शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 05:34 IST

राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

पुणे : राज्यात गेल्या पंधरवड्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे अर्ज केला आहे.राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, हरभरा काढणीला आला होता, तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकांवर पावसाचे पाणी फिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचा जमिनीवर सडा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय स्थानिक आपत्तीसाठी अर्ज नगर १,१२६, नाशिक २१६, चंद्रपूर ११, कोल्हापूर १, जालना ११,८८२, गोंदिया ५, सोलापूर १,१९२, जळगाव ६१७, सातारा ४, छ. संभाजीनगर ६,८९५, भंडारा १३, वाशिम १,३४१, बुलढाणा ३,०२५, नंदुरबार १,७३३, सांगली ३०१, यवतमाळ १६,०१९, अमरावती १,८४८, गडचिरोली ७, धाराशिव ५,२२४, लातूर १३,७६४, परभणी ६,०१०, वर्धा ३४०, नागपूर ४०४, हिंगोली २,०८०, अकोला २,९१६, धुळे ३,६७०, पुणे ६७, नांदेड ५६,३३५, बीड २१,७६३, एकूण १,६०,८०९

जिल्ह्यानुसार काढणीपश्चात नुकसान अर्जनगर २१७, नाशिक ३४, चंद्रपूर २, जालना १,७७९, गोंदिया ८, सोलापूर १,६०७, जळगाव ४३७, सातारा ८, वर्धा १,७५६, बुलढाणा ३,९३४, नंदुरबार १६२, सांगली ३१, यवतमाळ १३,६९५, अमरावती १,६३०, गडचिरोली २९, धाराशिव ३,४२३, लातूर ८,९८५, परभणी ७,४६४, वर्धा १०१, नागपूर ११५, हिंगोली २,०८६, अकोला १,६२२, धुळे १६१, पुणे ८, बीड ४,७४१, एकूण ५६,७२२.

राज्यातून १ लाख ६० हजार ८०९ अर्ज विमा कंपन्यांकडे आले आहेत. नुकसानभरपाईचा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ५ हजार २४१ अर्जदारांचे सर्वेक्षण झाले आहे, तर ५५ हजार ५६८ अर्जांचे सर्वेक्षण झालेेले नाही.

काढणीपश्चात नुकसान झालेल्यांमध्ये ५६ हजार ७२२ अर्ज आले आहेत. त्यापैकी २७ हजार ५२४ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, २९ हजार १९८ अर्जांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. यात सर्वाधिक १३ हजार ६९५ अर्ज यवतमाळमधून आले आहेत. त्याखालोखाल ८ हजार ९८५ अर्ज लातूरमधून आले आहेत.

उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४०, ६०, ७५, ८५ व १०० टक्के भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा. नुकसान झालेली बहुतेक पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई चांगली मिळणार आहे.- विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग

टॅग्स :Farmerशेतकरी