शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 05:34 IST

राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

पुणे : राज्यात गेल्या पंधरवड्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे अर्ज केला आहे.राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, हरभरा काढणीला आला होता, तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकांवर पावसाचे पाणी फिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचा जमिनीवर सडा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय स्थानिक आपत्तीसाठी अर्ज नगर १,१२६, नाशिक २१६, चंद्रपूर ११, कोल्हापूर १, जालना ११,८८२, गोंदिया ५, सोलापूर १,१९२, जळगाव ६१७, सातारा ४, छ. संभाजीनगर ६,८९५, भंडारा १३, वाशिम १,३४१, बुलढाणा ३,०२५, नंदुरबार १,७३३, सांगली ३०१, यवतमाळ १६,०१९, अमरावती १,८४८, गडचिरोली ७, धाराशिव ५,२२४, लातूर १३,७६४, परभणी ६,०१०, वर्धा ३४०, नागपूर ४०४, हिंगोली २,०८०, अकोला २,९१६, धुळे ३,६७०, पुणे ६७, नांदेड ५६,३३५, बीड २१,७६३, एकूण १,६०,८०९

जिल्ह्यानुसार काढणीपश्चात नुकसान अर्जनगर २१७, नाशिक ३४, चंद्रपूर २, जालना १,७७९, गोंदिया ८, सोलापूर १,६०७, जळगाव ४३७, सातारा ८, वर्धा १,७५६, बुलढाणा ३,९३४, नंदुरबार १६२, सांगली ३१, यवतमाळ १३,६९५, अमरावती १,६३०, गडचिरोली २९, धाराशिव ३,४२३, लातूर ८,९८५, परभणी ७,४६४, वर्धा १०१, नागपूर ११५, हिंगोली २,०८६, अकोला १,६२२, धुळे १६१, पुणे ८, बीड ४,७४१, एकूण ५६,७२२.

राज्यातून १ लाख ६० हजार ८०९ अर्ज विमा कंपन्यांकडे आले आहेत. नुकसानभरपाईचा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ५ हजार २४१ अर्जदारांचे सर्वेक्षण झाले आहे, तर ५५ हजार ५६८ अर्जांचे सर्वेक्षण झालेेले नाही.

काढणीपश्चात नुकसान झालेल्यांमध्ये ५६ हजार ७२२ अर्ज आले आहेत. त्यापैकी २७ हजार ५२४ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, २९ हजार १९८ अर्जांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. यात सर्वाधिक १३ हजार ६९५ अर्ज यवतमाळमधून आले आहेत. त्याखालोखाल ८ हजार ९८५ अर्ज लातूरमधून आले आहेत.

उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४०, ६०, ७५, ८५ व १०० टक्के भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा. नुकसान झालेली बहुतेक पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई चांगली मिळणार आहे.- विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग

टॅग्स :Farmerशेतकरी