शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सरकारबद्दल जनतेत अस्वस्थता

By admin | Updated: April 10, 2016 02:20 IST

दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसह जनसामान्यांशी निगडित विविध प्रश्नांवर वृत्तपत्र व जाहीर सभा यांमधून आम्ही आमच्या भावना मांडतो, ती आमची आदळआपट नसून जनतेच्या भावना

कोल्हापूर : दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसह जनसामान्यांशी निगडित विविध प्रश्नांवर वृत्तपत्र व जाहीर सभा यांमधून आम्ही आमच्या भावना मांडतो, ती आमची आदळआपट नसून जनतेच्या भावना असतात. पंधरा वर्षांची राजवट फेकून देत ज्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली त्यांच्या मनात सरकारबद्दल अस्वस्थता आहे. याबाबत आपण दक्ष राहिलो नाहीतर आपणही नालायक ठरू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सरकारला घरचा आहेर दिला. सदाशिवराव मंडलिक यांनी ज्या विश्वासाने संजय मंडलिक यांना आपल्याकडे सुपूर्त केले, त्यांचा विश्वासघात करणार नाही, त्यांची संपूर्ण जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हमीदवाडा (ता. कागल जि.कोल्हापूर ) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्याचे कौतुक करीत उद्धव ठाकरे म्हणाले, सदाशिवराव हे बंडखोर व्यक्तिमत्त्व होते. यशवंतराव चव्हाण यांनी कॉँग्रेस सोडल्यानंतर त्यांनाही सुनावण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. इच्छाशक्तीच्या जोरावर एकटा माणूस दूधगंगेचे पाणी वेदगंगेत आणून परिसराचे नंदनवन करू शकतो, तर आपण सर्वजण एकत्र येऊन दुष्काळावर काम का करू शकत नाही? शेतकरी सरकारकडे भीक मागत नाहीत, त्यांच्या कष्टाचे पैसे मागतात. निसर्ग कोपतो त्यावेळी सरकारकडून अपेक्षा असतात. दुष्काळाच्या काळात राजर्षी शाहू यांनी घोड्यावरून खेडोपाडी फिरून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न केले होते. त्या शाहूंची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात आम्ही सगळी एकत्र येऊन काम का करू शकत नाही, असा सवालही ठाकरे केला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंडलिक यांनी साखर कारखानदारीबरोबर शेतकरी जगला पाहिजे हे तत्त्व जोपासले. त्याच तत्त्वाने राज्य सरकारची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करून सरकारच्या चुका दाखविल्या. त्यांच्या सूचनांना सरकारमध्ये मानाचे स्थान असल्याचेही पाटील म्हणाले.यावेळी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार राजू शेट्टी यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी) कोल्हापूरचे मंत्रिपद पक्के डोक्यात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी वक्त्यांनी केली. याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, कोल्हापूरला मंत्रिमंडळात कधी स्थान द्यायचे हे पक्कं डोक्यात ठेवल्याचे सांगितले.उद्धव तुम्ही लढताय, पण सरकार हलेनादुष्काळाच्या प्रश्नावर लढण्याचे काम उद्धव ठाकरे तुम्ही करीत आहात; परंतु तुमचं सरकार अजून हलेना, असा टोला आ. पतंगराव कदम यांनी यावेळी हाणला.