शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर आता लायक व्यक्ती नेमावी, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:37 IST

मुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई- मुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं, वर्ष वाया गेलं आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही आदित्य ठाकरे यांनी  विचारला आहे..

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठ आणि कुलगुरूंवर टीकेची झोड उठली होती. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून ‘कुलगुरू हटाव’च्या मागणीने जोर धरला होता. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठ कायद्यातील कलम ११ (१४) (ई) प्रमाणे अधिकाराच्या दुरुपयोगाचा ठपका ठेवत कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकलं. विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात कुलगुरूंवर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.

डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. युवा सेनेने मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता सरकार जागं झालं असून कुलगुरुंना हटविण्यात आलं आहे.  पण इथेच थांबून चालणार नाही, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय कोणी घेतला , हा घोटाळा नाही का, मूल्यांकनासाठी नेमलेली कंपनी कोणाची आहे, हा गोंधळ सुरु असताना शिक्षण खाते काय करत होते अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

कुलगुरु जबाबदारीतून मोकळे झाले, पण ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, वर्ष वाया गेलं, मनस्तापही झाला त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवाल त्यांनी विचारला आहे. राज्य सरकारने कुलगुरुपदावर लायक व्यक्ती नेमावी. तसंच ऑनलाइन मूल्यांकनाचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठAditya Thackreyआदित्य ठाकरे