शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर आता लायक व्यक्ती नेमावी, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:37 IST

मुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई- मुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं, वर्ष वाया गेलं आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही आदित्य ठाकरे यांनी  विचारला आहे..

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठ आणि कुलगुरूंवर टीकेची झोड उठली होती. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून ‘कुलगुरू हटाव’च्या मागणीने जोर धरला होता. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठ कायद्यातील कलम ११ (१४) (ई) प्रमाणे अधिकाराच्या दुरुपयोगाचा ठपका ठेवत कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकलं. विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात कुलगुरूंवर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.

डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. युवा सेनेने मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता सरकार जागं झालं असून कुलगुरुंना हटविण्यात आलं आहे.  पण इथेच थांबून चालणार नाही, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय कोणी घेतला , हा घोटाळा नाही का, मूल्यांकनासाठी नेमलेली कंपनी कोणाची आहे, हा गोंधळ सुरु असताना शिक्षण खाते काय करत होते अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

कुलगुरु जबाबदारीतून मोकळे झाले, पण ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, वर्ष वाया गेलं, मनस्तापही झाला त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवाल त्यांनी विचारला आहे. राज्य सरकारने कुलगुरुपदावर लायक व्यक्ती नेमावी. तसंच ऑनलाइन मूल्यांकनाचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठAditya Thackreyआदित्य ठाकरे