शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 16:35 IST

पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहेवाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही

पुणे, दि. 27 - पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.

वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. विकासकामांसाठी निधी मोठयप्रमाणात उपलब्ध आहे, मात्र अधिकारी वेळेवर काम करीत नसल्याने काम रखडत असल्याची नाराजी ही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून  6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी बोलताना, शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली. सिंगापूरच्या धर्तीवर नगर नियोजन झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.