शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 16:35 IST

पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहेवाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही

पुणे, दि. 27 - पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.

वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. विकासकामांसाठी निधी मोठयप्रमाणात उपलब्ध आहे, मात्र अधिकारी वेळेवर काम करीत नसल्याने काम रखडत असल्याची नाराजी ही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून  6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी बोलताना, शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली. सिंगापूरच्या धर्तीवर नगर नियोजन झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.