शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार? केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले, "सर्वत्र रुग्ण सापडल्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 19:39 IST

राज्यात जीबीएसचा प्रभाव वाढला तर यात्रांवर निर्बंध आणावे लागतील असं केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं.

Prataprao Jadhav On GBS: गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यभरात जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेकजण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहेत. जीबीएसच्या अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता राज्यातील यात्रा आणि जत्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही यासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव व धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. जर हा आजार संसर्गजन्य असल्याचं समोर आलं तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील असंही प्रतापराव जाधव म्हणाले.

"जीबीएसचे रुग्ण सर्वत्र सापडायला लागले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय अतिशय तत्परतेने काम करत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे. जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे होत असल्याचं किंवा संसर्गजन्य असल्यास तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल," असं प्रतापराव जाधव म्हणाले.

जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांचे कारण कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरतोय. जीबीएस सामान्यतः व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने हा जीवाणूची लागण होते.

मांस शिवजवून खावे - अजित पवार

"जीबीएस रुग्णांची संख्या दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नागरिकांनी कच्चे मांस खाल्ल्याने या आजाराची बाधा झाल्याचे कारणही समोर आले आहे. नागरिकांनी कच्चे मांस न खाता ते चांगल्या प्रकारचे शिजवून मगच खावे. कोंबड्यांचे मांस खाल्याने हा आजार होत असला तरी कोंबड्यांना मारून टाकण्याची किंवा जाळून टाकणं असे करणे आवश्यक नाही. नागरिकांनी कच्चे मांस न खाता ते चांगल्या प्रकारचे शिजवून मगच खावे," असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवMaharashtraमहाराष्ट्र