शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आमदार वायकरांना एक मंत्र चांगलाच अवगत झालाय, तो म्हणजे...; सेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 20:19 IST

भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि राणे समर्थक व जोगेश्वरी पूर्व विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.

मुंबई - जोगेश्वरी येथील जनसंवाद यात्रेला केंद्रीय मंत्री नारायण राणे काल तब्बल तीन तास उशिरा आले. मात्र भर पावसात सुमारे तीन हजार जोगेश्वरीकर त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात, येथील श्याम नगर तलावाजवळ त्यांची मोठी सभा झाली. आपल्या सुमारे 20 मिनिटांच्या भाषणात त्यांनी येथील स्थानिक आमदार,माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि राणे समर्थक व जोगेश्वरी पूर्व विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर यापरिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही करण्यात आली होती.

आमदार वयकर हे शिवसेनेत आहेत, असे वाटत नाही. शिवसेनेत ते आमदार, मंत्री झाले, मात्र एक मंत्र त्यांना चांगला अवगत झाला आहे, तो म्हणजे टक्केवारीचा. प्रत्येकात त्यांची पार्टनरशिप आहे. घरबांधणीच्या कामात तर त्यांच्या पत्नीच्या नावे 28 कंपन्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मतदार संघात 50 टक्के गृहनिर्माण प्रकल्प बंद आहेत आणि येथील मराठी जनता बेघर झाली आहे. तुम्ही स्वस्थ कसे बसता? तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल त्यांनी येथील जनतेला केला.

गेली 32 वर्षे मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. जगातील इतर शहरे बघा आणि आपली मुंबईची दैन्यावस्था बघा. त्यांनी मुंबई बकाल केली आहे. ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. आगामी पालिका निवडणुकीत आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आपण केंद्रात जरी मंत्री असलो तरी आपले वास्तव्य मुंबईत असेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय मंत्री केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली. गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला जगात महासत्ता दाखवणारा रस्ता दाखवला. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात त्यांनी कोरोनाची सुरवात झाल्यावर लसनिर्मितीला प्राधान्य दिले आणि प्रभावी उपाययोजना करून कोरोना नियंत्रणात आणला. तर महाआघाडी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे देशातील 1/3 मृत्यू हे आपल्या महाराष्ट्रात झाले. येथे 1,36000 कोरोनाने मृत्यूमुखी पावले, अशी आकडेवारी त्यांनी दिली.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा,आमदार अमित साटम, आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेविका प्रीती सातम, जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि उपाध्यक्ष दत्ता शिरसाट आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRavindra Vaikarरवींद्र वायकर