शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आमदार वायकरांना एक मंत्र चांगलाच अवगत झालाय, तो म्हणजे...; सेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 20:19 IST

भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि राणे समर्थक व जोगेश्वरी पूर्व विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.

मुंबई - जोगेश्वरी येथील जनसंवाद यात्रेला केंद्रीय मंत्री नारायण राणे काल तब्बल तीन तास उशिरा आले. मात्र भर पावसात सुमारे तीन हजार जोगेश्वरीकर त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात, येथील श्याम नगर तलावाजवळ त्यांची मोठी सभा झाली. आपल्या सुमारे 20 मिनिटांच्या भाषणात त्यांनी येथील स्थानिक आमदार,माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि राणे समर्थक व जोगेश्वरी पूर्व विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर यापरिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही करण्यात आली होती.

आमदार वयकर हे शिवसेनेत आहेत, असे वाटत नाही. शिवसेनेत ते आमदार, मंत्री झाले, मात्र एक मंत्र त्यांना चांगला अवगत झाला आहे, तो म्हणजे टक्केवारीचा. प्रत्येकात त्यांची पार्टनरशिप आहे. घरबांधणीच्या कामात तर त्यांच्या पत्नीच्या नावे 28 कंपन्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मतदार संघात 50 टक्के गृहनिर्माण प्रकल्प बंद आहेत आणि येथील मराठी जनता बेघर झाली आहे. तुम्ही स्वस्थ कसे बसता? तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल त्यांनी येथील जनतेला केला.

गेली 32 वर्षे मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. जगातील इतर शहरे बघा आणि आपली मुंबईची दैन्यावस्था बघा. त्यांनी मुंबई बकाल केली आहे. ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. आगामी पालिका निवडणुकीत आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आपण केंद्रात जरी मंत्री असलो तरी आपले वास्तव्य मुंबईत असेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय मंत्री केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली. गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला जगात महासत्ता दाखवणारा रस्ता दाखवला. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात त्यांनी कोरोनाची सुरवात झाल्यावर लसनिर्मितीला प्राधान्य दिले आणि प्रभावी उपाययोजना करून कोरोना नियंत्रणात आणला. तर महाआघाडी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे देशातील 1/3 मृत्यू हे आपल्या महाराष्ट्रात झाले. येथे 1,36000 कोरोनाने मृत्यूमुखी पावले, अशी आकडेवारी त्यांनी दिली.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा,आमदार अमित साटम, आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेविका प्रीती सातम, जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि उपाध्यक्ष दत्ता शिरसाट आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRavindra Vaikarरवींद्र वायकर