शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? ४ आमदार संपर्कात आहेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 10:04 IST

Maharashtra News: ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना? ते फक्त मातोश्रीपुरते उरले आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले. टोकाला गेलेल्या संघर्षानंतर आता शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रातील एक बड्या नेत्याने शिवसेनेचे ४ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना फोडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता १५ वर आली आहे. अशा वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून, त्यातील चार आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  काही जण पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत

उद्धव ठाकरे गट आता राहिलेला नाही. शिवसेना संपत चालली आहे. शिवसेना ५६ आमदारावरून आता ६-७ वर आली आहेत. त्यातीलही काही जण पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. यातील ४ आमदार माझ्या संपर्कात आहेत. लवकरच माहिती सांगेन, असेही राणे म्हणाले. दुसरीकडे, शिधावाटपाला काहीही उशीर झाला नाही. त्यावर फोटो लावला तर काय बिघडले, फोटोवर आक्षेप घेणे ही संकुचित वृत्ती झाली. यावरून विनाकारण राजकारण सुरू आहे. आता त्यांच्या हातात काहीही राहिले नाही, त्यामुळे घरबसल्या षड्यंत्र करत राहायचे असे एकच काम आहे. ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना? ते फक्त मातोश्रीपुरते उरले आहेत. माझ्यासारखे जे होते ते साहेबाच्या काळात होते. आता कुणी नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी राजकारणाचा स्तर घसरला असल्याची टीका केली होती, यावर बोलताना, या म्हणण्यात तथ्य नाही. जे बोलतात त्यांचाच स्तर खालावला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे वैचारिक स्तर घसरू नये, असे राणे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे