शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

“राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही”; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 21:41 IST

Ramdas Athawale News: राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale News: देशभरात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. एनडीएचे मित्र पक्षही इंडियातील घटक पक्षांवर टीका करताना दिसत आहेत. आगामी पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे वाढताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, त्यांना भारत जोडो यात्रा काढण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकरांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केले? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती, या शब्दांत रामदास आठवले यांनी हल्लाबोल केला. 

राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही

राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे योग्य नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला.

दरम्यान, राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस काय करत होती? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचे काम केले. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधी