शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

“राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही”; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 21:41 IST

Ramdas Athawale News: राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale News: देशभरात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. एनडीएचे मित्र पक्षही इंडियातील घटक पक्षांवर टीका करताना दिसत आहेत. आगामी पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे वाढताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, त्यांना भारत जोडो यात्रा काढण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकरांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केले? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती, या शब्दांत रामदास आठवले यांनी हल्लाबोल केला. 

राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही

राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे योग्य नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला.

दरम्यान, राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस काय करत होती? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचे काम केले. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधी