शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

'महाजनादेश'ला आव्हान विरोधकांचे नव्हे, तर वाढत्या बेरोजगारीचं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 12:31 IST

राज्यातील बेरोजगारीवर वेळीच उपाययोजना काढली नाही, तर सत्ताधाऱ्यांना 'महाजनादेश' किंवा 'जन आशीर्वाद'ही वाचवू शकणार नाही, हे एव्हाना विरोधकांच्याही लक्षात आले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात महाजनादेश यात्रा काढली. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असून यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकही हतबल झालेले दिसत आहे. आधीच विरोधक पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरामुळेच कमकुवत झाले आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याचे अवसानही विरोधकांमध्ये उरले नसल्याची स्थिती आहे. मात्र सत्ताधारी भाजपला राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना नव्हे तर नवीनच आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना दररोज विविध क्षेत्रातील नोकऱ्या जात असल्याचे वृत्त येत आहे. बेरोजगारीची समस्या भीषण रूप धारण करत आहेत. दुसरीकडे पुढील निवडणूक जिंकण्यासाठी भाजप जीवाचे रान करताना दिसत आहे. राज्यात ७२ हजार पदांची भरती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काही दिवसांपूर्वी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पुणे-मुंबई-औरंगाबाद शहरांत स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब विचार करायला लावणारी आहेत. परंतु, ज्यांना नोकरी आहे, तेही बेरोजगार होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.

केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिले होते. तर राज्यातही देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक होत असल्याचा दावा अनेकदा केला आहे. प्रत्यक्षात मोदींचे आश्वासन आणि फडणवीसांचा दावा फोल ठरला ठरल्याचे दिसत आहे. याउलट राज्यात हातचे काम जाणाऱ्यां कामगारांची संख्या लाखाच्या पुढे गेली आहे. एकट्या औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या ५० हजारहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहे.

दरम्यान केंद्रीय पातळीवर उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी पॅकेज देण्याची वल्गना सरकारकडून केली जात असली तरी ग्राउंड लेव्हलवर ती किती यशस्वी ठरणार हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात तीन महिन्यांवर निवडणूक आहे. निवडणूक जवळ येईपर्यंत ही स्थिती आणखीनच भीषण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात बेरोजगारीमुळे जनतेत प्रक्षोभ होण्याची शक्यता असून सत्ताधारी भाजपसाठी ही बाब चिंता वाढविणारी आहे. एकूणच राज्यातील विरोधक जरी सशक्त नसले तरी बेरोजगारीमुळे सामान्यांचा सरकारविषयीचा रोष वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बेरोजगारीवर वेळीच उपाययोजना काढली नाही, तर सत्ताधाऱ्यांना 'महाजनादेश' किंवा 'जन आशीर्वाद'ही वाचवू शकणार नाही, हे एव्हाना विरोधकांच्याही लक्षात आले आहे.