शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शिंदेच्या नेतृत्त्वात आगामी निवडणुकीत ५० चे १०० आमदार होतील; उदय सामंत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 19:18 IST

Uday Samant : मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आज आमचे ५० आमदार आहेत, ते पुढच्या विधानसभेला १०० होतील, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनता स्वंयस्फूर्तीने एकनाथ शिंदे यांना भेटायला येत असते. या सर्वांची प्रचिती महाराष्ट्राच्या विकासात दिसेल. तसेच, मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी संघटना वाढीसाठी वक्तव्ये केली असतील, अनेकदा अशी वक्तव्ये चोवीस तासात बदलली आहेत. हे आपण पाहिले आहे. त्याचप्रमाणे जर जे.पी. नड्डा यांनी अशी वक्तव्ये केली असतील तर त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे ५० चे १०० आमदार होतील, अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

याचबरोबर, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मीही सामील झालो. शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. पण विनायक राऊत यांना ते मान्य नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका असावी, पण मी त्याचा राग मानत नाही. आश्चर्य याचे वाटतं की जे लोक विनायक राऊतांचा निवडणुकीत पराभव होण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनीही काल व्यासपीठावर निष्ठा व्यक्त केली, असे उदय सामंत म्हणाले.

याशिवाय, विनायक राऊत यांनाही मला काही बोलायचं नाही. पण आजही मी शिवसेनेतच आहे. त्यामुळे मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही. मला राऊत साहेबांनी अनेकदा मदत केली आहे. ते मी कधीच विसरणार नाही, असेही उदय सामंत यांनी सांगितले. तसेच, विनायक राऊत यांचा गैरसमजही काही दिवसात दूर होईल, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण