शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

उजनी धरणात दोन महिन्यांत आले केवळ ३२ टक्के पाणी

By admin | Updated: August 1, 2016 14:53 IST

पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़

ऑनलाइन लोकमत
बेंबळे, दि. १ -  पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़ त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी अजून १२८ टक्के पाणी येणे आवश्यक आहे़ सध्या वजा २८ टक्के पाणी आहे़ 
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अपेक्षित पाऊस झाला नाही़ परिणामी त्या धरणातून खाली पाणी सोडण्यासारखी स्थिती नाही़ गेल्या दोन महिन्यांत उजनीत अपेक्षित पाणी आले नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे़ पावसाळ्यापूर्वी उजनी धरणात वजा ५४ टक्क्यांपर्यंत पाणी खाली गेले होते़ ही मायनसची विक्रमी पातळी ठरली होती़ यानंतर जूनमध्ये या पातळीत कसलीच वाढ झाली नाही़ जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे उजनी धरण वजा ५४ टक्क्यांवरून ते वजा २८ टक्क्यांपर्यंत पाणी आले आहे़ हे २६ टक्के पाणी आणि आषाढीवारी व सोलापूरला पिण्यासाठी म्हणून ३़५४ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे सर्व मिळून ३२ टक्के पाणी उजनीत धरणात जमा झाले़ मात्र यापेक्षा ४ पट  म्हणजेच १२८ टक्के पाणी उजनी धरणात येणे गरजेचे आहे़  आनंदाची बाब म्हणजे उजनीवरील १९ धरणांपैकी १४ धरणांतील पाणीस्थिती सुधारली आहे़ कारण येथून पुढे येणारा पाऊस व पाणी थेट उजनी धरणात येणार आहे़ 
 
उजनीची सद्यस्थिती
- पाणीपातळी  - ४८८़६१० मीटर
- एकूण पाणीसाठा - १३७५़४९ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा - वजा ४२७़३२ दलघमी
- टक्केवारी - वजा २८़२७ टक्के
- दौंडमधून विसर्ग ८६५ क्युसेक्स
- बंडगार्डन २९१६ क्युसेक्स
 
टेल टु हेड नियम पाळण्याची गरज
पाणी साठ्यासाठी टेल टु हेड हा नियम आतापर्यंत केवळ कागदावरच राहिला आहे़ उजनी धरण किमान ५० टक्के येईपर्यंत वरील १९ धरणांतून पाणी खाली सोडणे आवश्यक आहे़ जोपर्यंत टेलला असलेल्या उजनी धरणात ५० टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत टू हेड असणाºया एकाही धरणात पाणी अडवता कामा नये़ असा कायदा असूनही याचे पालन कोणीही करत नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांना त्या १९ धरणांच्या पाणीसाठ्याकडे लक्ष द्यावे लागते़ 
 
वरच्या धरणाची स्थिती
- येडगाव ८४़५० टक्के, वडूज ७५़०८ टक्के, डिंभे ४५़७६ टक्के, कलमोडी १०० टक्के, चासकमान ६७ टक्के, भामा आसखेड ५४़१० टक्के, वडिवाले ७३़०७ टक्के, आंध्रा ७३ टक्के, कासारसाई ८४ टक्के, मुळशी ६८ टक्के, वरसगाव ५४ टक्के, पानशेत ६४़०३ टक्के, खडकवासला ७५ टक्के, खोड ४९ टक्के़ केवळ विसापूर, माणिकडोह, पिंपळगाव जोगे या धरणांची स्थिती बिकट आहे़ 
ऊस लागवडी थांबल्या
उजनी धरणात अद्यापपर्यंत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्यामुळे १ आॅगस्टच्या आत होणाºया आडसाली उसाच्या लागवडी पूर्णपणे थांबल्या आहेत़ कारण गेल्या दुष्काळात होरपळून निघालेला शेतकरी उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला तरच ऊस लागवड करण्याचे धाडस करेल अन्यथा नाही़ .