शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात दोन महिन्यांत आले केवळ ३२ टक्के पाणी

By admin | Updated: August 1, 2016 14:53 IST

पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़

ऑनलाइन लोकमत
बेंबळे, दि. १ -  पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़ त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी अजून १२८ टक्के पाणी येणे आवश्यक आहे़ सध्या वजा २८ टक्के पाणी आहे़ 
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अपेक्षित पाऊस झाला नाही़ परिणामी त्या धरणातून खाली पाणी सोडण्यासारखी स्थिती नाही़ गेल्या दोन महिन्यांत उजनीत अपेक्षित पाणी आले नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे़ पावसाळ्यापूर्वी उजनी धरणात वजा ५४ टक्क्यांपर्यंत पाणी खाली गेले होते़ ही मायनसची विक्रमी पातळी ठरली होती़ यानंतर जूनमध्ये या पातळीत कसलीच वाढ झाली नाही़ जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे उजनी धरण वजा ५४ टक्क्यांवरून ते वजा २८ टक्क्यांपर्यंत पाणी आले आहे़ हे २६ टक्के पाणी आणि आषाढीवारी व सोलापूरला पिण्यासाठी म्हणून ३़५४ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे सर्व मिळून ३२ टक्के पाणी उजनीत धरणात जमा झाले़ मात्र यापेक्षा ४ पट  म्हणजेच १२८ टक्के पाणी उजनी धरणात येणे गरजेचे आहे़  आनंदाची बाब म्हणजे उजनीवरील १९ धरणांपैकी १४ धरणांतील पाणीस्थिती सुधारली आहे़ कारण येथून पुढे येणारा पाऊस व पाणी थेट उजनी धरणात येणार आहे़ 
 
उजनीची सद्यस्थिती
- पाणीपातळी  - ४८८़६१० मीटर
- एकूण पाणीसाठा - १३७५़४९ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा - वजा ४२७़३२ दलघमी
- टक्केवारी - वजा २८़२७ टक्के
- दौंडमधून विसर्ग ८६५ क्युसेक्स
- बंडगार्डन २९१६ क्युसेक्स
 
टेल टु हेड नियम पाळण्याची गरज
पाणी साठ्यासाठी टेल टु हेड हा नियम आतापर्यंत केवळ कागदावरच राहिला आहे़ उजनी धरण किमान ५० टक्के येईपर्यंत वरील १९ धरणांतून पाणी खाली सोडणे आवश्यक आहे़ जोपर्यंत टेलला असलेल्या उजनी धरणात ५० टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत टू हेड असणाºया एकाही धरणात पाणी अडवता कामा नये़ असा कायदा असूनही याचे पालन कोणीही करत नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांना त्या १९ धरणांच्या पाणीसाठ्याकडे लक्ष द्यावे लागते़ 
 
वरच्या धरणाची स्थिती
- येडगाव ८४़५० टक्के, वडूज ७५़०८ टक्के, डिंभे ४५़७६ टक्के, कलमोडी १०० टक्के, चासकमान ६७ टक्के, भामा आसखेड ५४़१० टक्के, वडिवाले ७३़०७ टक्के, आंध्रा ७३ टक्के, कासारसाई ८४ टक्के, मुळशी ६८ टक्के, वरसगाव ५४ टक्के, पानशेत ६४़०३ टक्के, खडकवासला ७५ टक्के, खोड ४९ टक्के़ केवळ विसापूर, माणिकडोह, पिंपळगाव जोगे या धरणांची स्थिती बिकट आहे़ 
ऊस लागवडी थांबल्या
उजनी धरणात अद्यापपर्यंत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्यामुळे १ आॅगस्टच्या आत होणाºया आडसाली उसाच्या लागवडी पूर्णपणे थांबल्या आहेत़ कारण गेल्या दुष्काळात होरपळून निघालेला शेतकरी उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला तरच ऊस लागवड करण्याचे धाडस करेल अन्यथा नाही़ .