शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात दोन महिन्यांत आले केवळ ३२ टक्के पाणी

By admin | Updated: August 1, 2016 14:53 IST

पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़

ऑनलाइन लोकमत
बेंबळे, दि. १ -  पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़ त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी अजून १२८ टक्के पाणी येणे आवश्यक आहे़ सध्या वजा २८ टक्के पाणी आहे़ 
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अपेक्षित पाऊस झाला नाही़ परिणामी त्या धरणातून खाली पाणी सोडण्यासारखी स्थिती नाही़ गेल्या दोन महिन्यांत उजनीत अपेक्षित पाणी आले नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे़ पावसाळ्यापूर्वी उजनी धरणात वजा ५४ टक्क्यांपर्यंत पाणी खाली गेले होते़ ही मायनसची विक्रमी पातळी ठरली होती़ यानंतर जूनमध्ये या पातळीत कसलीच वाढ झाली नाही़ जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे उजनी धरण वजा ५४ टक्क्यांवरून ते वजा २८ टक्क्यांपर्यंत पाणी आले आहे़ हे २६ टक्के पाणी आणि आषाढीवारी व सोलापूरला पिण्यासाठी म्हणून ३़५४ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे सर्व मिळून ३२ टक्के पाणी उजनीत धरणात जमा झाले़ मात्र यापेक्षा ४ पट  म्हणजेच १२८ टक्के पाणी उजनी धरणात येणे गरजेचे आहे़  आनंदाची बाब म्हणजे उजनीवरील १९ धरणांपैकी १४ धरणांतील पाणीस्थिती सुधारली आहे़ कारण येथून पुढे येणारा पाऊस व पाणी थेट उजनी धरणात येणार आहे़ 
 
उजनीची सद्यस्थिती
- पाणीपातळी  - ४८८़६१० मीटर
- एकूण पाणीसाठा - १३७५़४९ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा - वजा ४२७़३२ दलघमी
- टक्केवारी - वजा २८़२७ टक्के
- दौंडमधून विसर्ग ८६५ क्युसेक्स
- बंडगार्डन २९१६ क्युसेक्स
 
टेल टु हेड नियम पाळण्याची गरज
पाणी साठ्यासाठी टेल टु हेड हा नियम आतापर्यंत केवळ कागदावरच राहिला आहे़ उजनी धरण किमान ५० टक्के येईपर्यंत वरील १९ धरणांतून पाणी खाली सोडणे आवश्यक आहे़ जोपर्यंत टेलला असलेल्या उजनी धरणात ५० टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत टू हेड असणाºया एकाही धरणात पाणी अडवता कामा नये़ असा कायदा असूनही याचे पालन कोणीही करत नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांना त्या १९ धरणांच्या पाणीसाठ्याकडे लक्ष द्यावे लागते़ 
 
वरच्या धरणाची स्थिती
- येडगाव ८४़५० टक्के, वडूज ७५़०८ टक्के, डिंभे ४५़७६ टक्के, कलमोडी १०० टक्के, चासकमान ६७ टक्के, भामा आसखेड ५४़१० टक्के, वडिवाले ७३़०७ टक्के, आंध्रा ७३ टक्के, कासारसाई ८४ टक्के, मुळशी ६८ टक्के, वरसगाव ५४ टक्के, पानशेत ६४़०३ टक्के, खडकवासला ७५ टक्के, खोड ४९ टक्के़ केवळ विसापूर, माणिकडोह, पिंपळगाव जोगे या धरणांची स्थिती बिकट आहे़ 
ऊस लागवडी थांबल्या
उजनी धरणात अद्यापपर्यंत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्यामुळे १ आॅगस्टच्या आत होणाºया आडसाली उसाच्या लागवडी पूर्णपणे थांबल्या आहेत़ कारण गेल्या दुष्काळात होरपळून निघालेला शेतकरी उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला तरच ऊस लागवड करण्याचे धाडस करेल अन्यथा नाही़ .