शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण १०० टक्के भरले

By admin | Updated: October 1, 2016 23:48 IST

मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे

- सिध्देश्वर शिंदे/ आॅनलाईन लोकमतसोलापूर, दि.01 - मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीने यंदाच्या वर्षी १०० टक्केचा आकडा गाठला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास उजनी धरण १००. 45 % टक्के झाल्याने शेतकरी, साखर कारखानदार, राजकारणी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.उजनी धरण यावर्षी आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळीवर आले होते़ त्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस पडला नाही़ त्यामुळे यावर्षी उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येणार की नाही याबद्दल शंका निर्माण करण्यात येत होती़ कारण उजनी मायनस ५३.५३ पर्यंत खाली आले होते़ त्यातच जुन-जुलै या महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ६० दिवसात केवळ उजनीत ३२ टक्के पाणी आले़ आॅगस्ट उजडला तरी उजनी मायनस २८ टक्के एवढीच होती़ मात्र आॅगस्टमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने ६ दिवसात म्हणजे ६ आॅगस्टला उजनी धरणाने मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश केला़.मृत साठ्यातील ५३ टक्के पाणीसाठा भरून निघण्यास तब्बल ६६ दिवस पावसाळ्याचे गेले़ ६ आॅगस्ट ते १ आॅक्टोबर या ५५ दिवसात उजनी धरणाने दोन टप्प्यात कधी वेगाने तर कधी संथगतीने उजनी धरण १०० टक्के झाले आहे..उजनी धरण २८ वेळा गाठली शंभरीउजनी धरण यावर्षी उशिरा का होईना १०० टक्के झाले आहे़ उजनी धरणाने त्याच्या इतिहासात ३६ वर्षात २८ वेळा शंभर टक्के भरले आहे़ त्यात सर्वात उशिरा २००९ साली १०० टक्के भरले़ तेही केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसावर कारण २००९ साली १९ धरणातून एक थेंबही पाणी उजनी धरणात आले नव्हते.

उजनी धरणाची पाणीपातळीएकूण पाणीपातळी : ४९६.८१० मीटरएकूण पाणीसाठा : ३३१३.३० द़ल़घ़मीउपयुक्त साठा : १६१०़४९ द़ल़घ़मीटक्केवारी : 100. 45 टक्केविसर्ग : दौंड : ५०४६ तर बंडगार्डनमधून ३२८० ने पाणी येत आहे.उजनीत ५००० अन जाते ३३००उजनी धरण गेल्या चार पाच दिवसापूर्वी १०० टक्के होण्याची अपेक्षा होती़ परंतू दौड येथुन उजनीत येणाऱ्या विसर्गात कमालीची घट झाल्याने दररोज केवळ अर्धा, पाव टक्के पाणी वाढत गेले़ कारण दौंड येथुन उजनीत ५००० क्युसेसने विसर्ग येत होता अन ते आजही येत आहे़ उजनी कालव्याव्दारे १५०० क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे़ त्यामुळे येणारे ५००० क्सुसेक तर जाणारे ३३०० म्हणजेच केवळ १७०० क्सुसेकने उजनी वाढत आहे.१२१ दिवसात १६३ टक्के पाणी झाले जमायावर्षी उजनी धरणात १२१ दिवसात १६३ टक्के पाणी म्हणजे १२३़६३ टीएमसी पाणी जमा झाले आहे़ उजनी मायनस ५३़५३ टक्के प्लस १०० टक्के पाणी उजनी धरणातून कालवा, बोगदा यातून ८़५० टीएमसी पाणी सोडले होते असे एकूण १२१ दिवसात १२५़६३ टीएमसी अर्थात १६३ टक्के पाणी जमा झाले आहे़ चार महिन्यात उजनी दररोज १ टीएमसी पाणी जमा झाले आहे.उजनीतून भीमेत पाणी सोडण्याची शक्यता येणारउजनी धरणाची शंभरी पूर्ण झाली आहे़ त्यात पावसाने सुरूवात केल्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के (१२३ टीएमसी) भरणार हे नक्की आहे़ त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.७ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवातउजनी धरणावरील १९ पैकी ४ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे़ वडज ८३२, घोड ३०००, कलमोडी ३२०, भामा आसखेड २१०० तर शनिवारी दिवसभर पुणे परिसरातील ८ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. आंध्रा ५ मिमी, पवना ९ मिमी, कासारसाई ३० मीमी, मुळशी १३ मीमी, टेमघर २२ मीमी, वरसगांव १८ मीमी, पानशेत १५ मीमी एवढा पाऊस झाला आहे.