शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महाराष्ट्राला दिलासा! यूजीसीकडून परीक्षा घेण्यास १ महिन्याची मुदतवाढ; राज्य सरकारची विनंती मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 23:18 IST

३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेता येणार; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना

मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) राज्य सरकारला दिलासा दिला आहे. विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी यूजीसीनं राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. राज्यातील कोरोना संकटाचा विचार करता परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करून यूजीसीनं एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घ्याव्या लागतील. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा विचार करता, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. तसा निर्णयदेखील राज्य सरकारनं घेतला होता. मात्र अंतिम वर्षाची परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना आधीच्या वर्षांतील कामगिरीच्या आधारे पदवी देण्याचा किंवा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय कायद्याला धरून नाही. परिणामी अंतिम परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच हे स्पष्ट झालं. मात्र राज्यातील सध्याची स्थिती पाहता सरकारनं यूजीसीकडे एक महिन्याची वाढीव मुदत मागितली. राज्य सरकारची ही विनंती यूजीसीनं मान्य केली. त्यामुळे आता ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेता येतील. परीक्षा घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना यूजीसीनं राज्य सरकारला केल्या आहेत. 

टॅग्स :universityविद्यापीठSupreme Courtसर्वोच्च न्यायालय