शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

उद्योगनगरीत काँग्रेस पोरकी

By admin | Updated: July 11, 2017 00:22 IST

केंद्र आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांच्या दुर्लक्षामुळेच एकेकाळी काँग्रेसचा गड असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसचा एकही प्रतिनिधी राहिलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्र आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांच्या दुर्लक्षामुळेच एकेकाळी काँग्रेसचा गड असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसचा एकही प्रतिनिधी राहिलेला नाही. शहर पातळीवर पक्षाची झालेली पडझड रोखण्यासाठी आणि पक्षसंघटना बांधणी करणे, पक्षाची ताकत वाढविण्याच्या दृष्टीने नेत्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.पिंपरी-चिंचवड ही कामगार व कष्टकऱ्यांची नगरी आहे. शहराच्या विकासात एकत्रित काँग्रेस असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे योगदान मोलाचे आहे. १९८६च्या निवडणुकीपासून पवार आणि मोरे असे दोन गट कार्यरत होते. पुढे १९९२ नंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतरही प्रा. मोरे गटाचा प्रभाव कायम होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतरही २००२ च्या निवडणुकीपर्यंत शहरातील राजकारणात प्रा. मोरे यांनी काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवले होते. प्रा. मोरे यांच्या निधनानंतर काँग्रेस फुटण्यास सुरुवात झाली. त्या वेळी ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे यांच्यासह एक गट काँग्रेसमधून बाहेर पडला आणि पुढे राष्ट्रवादीत विलीन झाला. त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून श्रीरंग बारणे यांची निवड झाली. २००७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. पुढे बारणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून २००९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. भाऊसाहेब भोईर यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाली. सत्ता असतानाही राष्ट्रवादीने पिंपरीतील कार्यकर्त्यांना विविध पदे दिली. मात्र, प्रा. मोरे यांच्यानंतर राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय नेत्यांनी लक्ष न दिल्याने काँग्रेसची उतरती कळा कायम राहिली. प्रा. मोरे यांच्यानंतर तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी, संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्यावरही शहराची जबाबदारी सोपविली. मात्र, नेत्यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने पालिकेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी कमी होत गेले. राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या बरोबरीने असल्याने येथील कार्यकर्त्यांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ताकत दिलीच नाही. सत्तेत असतानाही दुर्लक्षराज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. केवळ जाहीर सभा किंवा कार्यक्रमांना उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांना ताकत देण्याच्या दृष्टीने काहीही केले नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. प्राधिकरणाची समितीवगळता एकही पद कार्यकर्त्यांना दिले नाही. >राष्ट्रवादीच्या मनसुब्याला यशकाँग्रेस वाढविण्यासाठी आजवरच्या सर्वच शहराध्यक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न केले; मात्र, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी जी ताकत मिळायला हवी, ती न मिळत गेल्याने एकेकाळी सत्तेची सूत्रे हाती असणारी काँग्रेस २०१७च्या निवडणुकीत शून्य झाली. नेत्यांनी लक्ष न दिल्याने काँग्रेसच संपविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसुबा यशस्वी झाला.