शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

By admin | Updated: March 11, 2016 08:19 IST

ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ११ -  ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवाद आणि राष्ट्रद्रोहच आहे. नऊ हजार कोटी हा जनतेच्या घामाचा पैसा होता. त्याची अशी विल्हेवाट लावणारे ‘आर्थिक’ दहशतवादीच आहेत असंदेखील ते बोलले आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या देश सोडून लंडनला गेल्याप्रकरणी एकीकडे विरोधक सरकारला धारेवर धरत असताना मित्रपक्ष शिवसेनादेखील सरकारला जाब विचारत आहे. 
 
दाऊदला हिंदुस्थानात आणावे यासाठी सरकार पाकिस्तानकडे याचना करीत आहे, पण त्याच सरकारच्या डोळ्यासमोर व्हाईट कॉलर आर्थिक दहशतवादी पळून गेले. मल्ल्या पळून जाणार हे या देशातील शेंबडे पोरही सांगू शकत होते, पण सरकारला ते समजले नाही याचे आश्‍चर्य वाटते. मल्ल्याच्या श्रीमंती पार्टीतली झिंग सगळ्यांच्याच नसांत सळसळते आहे. ती उतरल्यावरच बोलावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मल्ल्या पळून गेले ही अफवा किंवा कुजबूज नाही, तर केंद्र सरकारने छाती पुढे काढून अत्यंत गर्वाने व अभिमानाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवली आहे! देशातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून, सरकारी तिजोरीला चुना लावून एक उद्योगपती पळून जातोच कसा? हा प्रश्‍न आता सरकारला कोणी विचारू नये. कर्ज देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम यूपीए सरकारच्या काळात झाला, पण कर्ज बुडवून पळून जाण्याचा उपक्रम एनडीए सरकारच्या काळात पार पडला. हे भयंकर असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
महाराष्ट्रातला शेतकरी कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय. त्याचे कर्ज पाच-पंचवीस हजारांचे असते, त्यासाठी घर, शेती त्याला तारण ठेवावी लागते. अस्मानी-सुलतानीमुळे कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही तर कर्जवसुलीसाठी त्याच्या घर आणि शेतीवर जप्तीचा आदेश बजावला जातो. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी हाय खातो व आत्महत्या करतो. त्याला मल्ल्याप्रमाणे कर्ज बुडवता येत नाही व पळूनही जाता येत नाही. गरीब माणूस किंवा शेतकरी पळून गेला तरी पोलीस त्याचा पाठलाग करतील आणि फरफटत आणून तुरुंगात टाकतील. पण मल्ल्या, ललित मोदींसाठी वेगळा कायदा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.