शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

By admin | Updated: March 11, 2016 08:19 IST

ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ११ -  ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवाद आणि राष्ट्रद्रोहच आहे. नऊ हजार कोटी हा जनतेच्या घामाचा पैसा होता. त्याची अशी विल्हेवाट लावणारे ‘आर्थिक’ दहशतवादीच आहेत असंदेखील ते बोलले आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या देश सोडून लंडनला गेल्याप्रकरणी एकीकडे विरोधक सरकारला धारेवर धरत असताना मित्रपक्ष शिवसेनादेखील सरकारला जाब विचारत आहे. 
 
दाऊदला हिंदुस्थानात आणावे यासाठी सरकार पाकिस्तानकडे याचना करीत आहे, पण त्याच सरकारच्या डोळ्यासमोर व्हाईट कॉलर आर्थिक दहशतवादी पळून गेले. मल्ल्या पळून जाणार हे या देशातील शेंबडे पोरही सांगू शकत होते, पण सरकारला ते समजले नाही याचे आश्‍चर्य वाटते. मल्ल्याच्या श्रीमंती पार्टीतली झिंग सगळ्यांच्याच नसांत सळसळते आहे. ती उतरल्यावरच बोलावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मल्ल्या पळून गेले ही अफवा किंवा कुजबूज नाही, तर केंद्र सरकारने छाती पुढे काढून अत्यंत गर्वाने व अभिमानाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवली आहे! देशातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून, सरकारी तिजोरीला चुना लावून एक उद्योगपती पळून जातोच कसा? हा प्रश्‍न आता सरकारला कोणी विचारू नये. कर्ज देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम यूपीए सरकारच्या काळात झाला, पण कर्ज बुडवून पळून जाण्याचा उपक्रम एनडीए सरकारच्या काळात पार पडला. हे भयंकर असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
महाराष्ट्रातला शेतकरी कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय. त्याचे कर्ज पाच-पंचवीस हजारांचे असते, त्यासाठी घर, शेती त्याला तारण ठेवावी लागते. अस्मानी-सुलतानीमुळे कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही तर कर्जवसुलीसाठी त्याच्या घर आणि शेतीवर जप्तीचा आदेश बजावला जातो. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी हाय खातो व आत्महत्या करतो. त्याला मल्ल्याप्रमाणे कर्ज बुडवता येत नाही व पळूनही जाता येत नाही. गरीब माणूस किंवा शेतकरी पळून गेला तरी पोलीस त्याचा पाठलाग करतील आणि फरफटत आणून तुरुंगात टाकतील. पण मल्ल्या, ललित मोदींसाठी वेगळा कायदा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.