शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

By admin | Updated: March 11, 2016 08:19 IST

ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ११ -  ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवाद आणि राष्ट्रद्रोहच आहे. नऊ हजार कोटी हा जनतेच्या घामाचा पैसा होता. त्याची अशी विल्हेवाट लावणारे ‘आर्थिक’ दहशतवादीच आहेत असंदेखील ते बोलले आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या देश सोडून लंडनला गेल्याप्रकरणी एकीकडे विरोधक सरकारला धारेवर धरत असताना मित्रपक्ष शिवसेनादेखील सरकारला जाब विचारत आहे. 
 
दाऊदला हिंदुस्थानात आणावे यासाठी सरकार पाकिस्तानकडे याचना करीत आहे, पण त्याच सरकारच्या डोळ्यासमोर व्हाईट कॉलर आर्थिक दहशतवादी पळून गेले. मल्ल्या पळून जाणार हे या देशातील शेंबडे पोरही सांगू शकत होते, पण सरकारला ते समजले नाही याचे आश्‍चर्य वाटते. मल्ल्याच्या श्रीमंती पार्टीतली झिंग सगळ्यांच्याच नसांत सळसळते आहे. ती उतरल्यावरच बोलावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मल्ल्या पळून गेले ही अफवा किंवा कुजबूज नाही, तर केंद्र सरकारने छाती पुढे काढून अत्यंत गर्वाने व अभिमानाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवली आहे! देशातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून, सरकारी तिजोरीला चुना लावून एक उद्योगपती पळून जातोच कसा? हा प्रश्‍न आता सरकारला कोणी विचारू नये. कर्ज देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम यूपीए सरकारच्या काळात झाला, पण कर्ज बुडवून पळून जाण्याचा उपक्रम एनडीए सरकारच्या काळात पार पडला. हे भयंकर असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
महाराष्ट्रातला शेतकरी कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय. त्याचे कर्ज पाच-पंचवीस हजारांचे असते, त्यासाठी घर, शेती त्याला तारण ठेवावी लागते. अस्मानी-सुलतानीमुळे कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही तर कर्जवसुलीसाठी त्याच्या घर आणि शेतीवर जप्तीचा आदेश बजावला जातो. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी हाय खातो व आत्महत्या करतो. त्याला मल्ल्याप्रमाणे कर्ज बुडवता येत नाही व पळूनही जाता येत नाही. गरीब माणूस किंवा शेतकरी पळून गेला तरी पोलीस त्याचा पाठलाग करतील आणि फरफटत आणून तुरुंगात टाकतील. पण मल्ल्या, ललित मोदींसाठी वेगळा कायदा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.