शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

By admin | Updated: March 11, 2016 08:19 IST

ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ११ -  ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवाद आणि राष्ट्रद्रोहच आहे. नऊ हजार कोटी हा जनतेच्या घामाचा पैसा होता. त्याची अशी विल्हेवाट लावणारे ‘आर्थिक’ दहशतवादीच आहेत असंदेखील ते बोलले आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या देश सोडून लंडनला गेल्याप्रकरणी एकीकडे विरोधक सरकारला धारेवर धरत असताना मित्रपक्ष शिवसेनादेखील सरकारला जाब विचारत आहे. 
 
दाऊदला हिंदुस्थानात आणावे यासाठी सरकार पाकिस्तानकडे याचना करीत आहे, पण त्याच सरकारच्या डोळ्यासमोर व्हाईट कॉलर आर्थिक दहशतवादी पळून गेले. मल्ल्या पळून जाणार हे या देशातील शेंबडे पोरही सांगू शकत होते, पण सरकारला ते समजले नाही याचे आश्‍चर्य वाटते. मल्ल्याच्या श्रीमंती पार्टीतली झिंग सगळ्यांच्याच नसांत सळसळते आहे. ती उतरल्यावरच बोलावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मल्ल्या पळून गेले ही अफवा किंवा कुजबूज नाही, तर केंद्र सरकारने छाती पुढे काढून अत्यंत गर्वाने व अभिमानाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवली आहे! देशातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून, सरकारी तिजोरीला चुना लावून एक उद्योगपती पळून जातोच कसा? हा प्रश्‍न आता सरकारला कोणी विचारू नये. कर्ज देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम यूपीए सरकारच्या काळात झाला, पण कर्ज बुडवून पळून जाण्याचा उपक्रम एनडीए सरकारच्या काळात पार पडला. हे भयंकर असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
महाराष्ट्रातला शेतकरी कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय. त्याचे कर्ज पाच-पंचवीस हजारांचे असते, त्यासाठी घर, शेती त्याला तारण ठेवावी लागते. अस्मानी-सुलतानीमुळे कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही तर कर्जवसुलीसाठी त्याच्या घर आणि शेतीवर जप्तीचा आदेश बजावला जातो. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी हाय खातो व आत्महत्या करतो. त्याला मल्ल्याप्रमाणे कर्ज बुडवता येत नाही व पळूनही जाता येत नाही. गरीब माणूस किंवा शेतकरी पळून गेला तरी पोलीस त्याचा पाठलाग करतील आणि फरफटत आणून तुरुंगात टाकतील. पण मल्ल्या, ललित मोदींसाठी वेगळा कायदा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.