शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये -  रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:09 IST

भाजपा व शिवसेनेने विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढविली. निवडणुकीनंतर दोघांनीही एकत्र येण्याची भूमिका घेतली. आता दोघांनीही सत्ता टिकविण्यासाठी आपसात जुळवून घेणे आवश्यक आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

 नागपूर  -  भाजपा व शिवसेनेने विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढविली. निवडणुकीनंतर दोघांनीही एकत्र येण्याची भूमिका घेतली. आता दोघांनीही सत्ता टिकविण्यासाठी आपसात जुळवून घेणे आवश्यक आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मात्र, तसे झाले तर दुस-याच दिवशी आपण शरद पवार यांची भेट घेऊ. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाला सत्तेसाठी १५ आमदार कमी पडतात. अविश्वासाचा ठराव आल्यावर भाजपाला कुणीही पाठिंबा देऊ शकते. शिवसेनेचे आमदारही येऊ शकतात. विरोधी गोटातील काही आमदार अनुपस्थित राहू शकतात. नरसिंहराव यांचे सरकार असेच टिकले होते. त्यामुळे सरकार पडणारच नसेल तर शिवसेनेने पाठिंबा काढू नये, असा सल्ला त्यांनी दिला. सरकार पडले व निवडणुकीला जाण्याची वेळ आली तर त्यासाठीही रिपाइं भाजपासोबत सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपाइं (आ.) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.आठवले काय म्हणाले...- माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा हे काँग्रेसमध्ये असल्यासारखे बोलत आहेत. कदाचित मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असावेत. केंद्र सरकार चांगले काम करीत आहे. अधिक वेळ द्यायला हवा.- नारायण राणे यांनी भाजपामध्ये जावे. तिकडे जमणार नसेल तर आम्ही त्यांना रिपाइंमध्ये घेण्यास तयार आहोत.- नाराज असलेले भाजपाचे खासदार नाना पटोले यांना काय हवे आहे माहीत नाही. मात्र, पटोलेंना शांत कसे करायचे हे भाजपाला माहीत आहे.- एल्फिस्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी.भाजपाने वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी भाजपाने वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. आता केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाने वर्षभरात विदर्भ राज्याची घोषणा करावी. या मागणीसाठी रिपाइंतर्फे १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ह्यस्वतंत्र विदर्भ राज्य मागणी परिषदह्ण आयोजित केली जाईल. तीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षीय विदर्भ समर्थक नेत्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेना