शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

नृत्य स्पर्धेऐवजी स्वातीला पासचे २६० रुपये द्यायला हवे होते - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 26, 2015 11:54 IST

राज्य सरकारने बँकॉकला जाणा-या नृत्य पथकाला पैसे देण्याऐवजी लातूरमध्ये बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणा-या मुलीला मदत करायला हवी होती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राज्य सरकारने तिजोरीतून ‘बँकॉक’ला जाणार्‍या नृत्य कलापथकास आठ लाख रुपये दिले, मात्र लातूरमध्ये स्वाती या विद्यार्थीनीने बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत, म्हणून आत्महत्या केली, हे राज्यातील अस्वस्थ मानसिकतेचे विदारक चित्र आहे, अशी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. राज्यात फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच मित्रपक्ष शिवसेनेने भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.  अशा किती स्वाती आज महाराष्ट्रात आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत व सरकार त्यांचे जीव वाचविण्यासाठी काय करणार आहे, असा सवालही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.  
देवेंद्र सरकार वर्षपूर्ती साजरी करीत असताना भाजप मंत्री वर्षपूर्तीचा सोहळा स्वतंत्रपणे साजरा करण्याच्या विचारात आहेत. सोहळा फार भव्यदिव्य नसला (दुष्काळाच्या कारणामुळे) तरी आमचे आम्ही एकटेच सण साजरा करू अशा भूमिकेत सत्तेतील आमचे मित्र आहेत, अशी टीका त्यांवनी केली. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असे हे स्वातीचे आत्महत्या प्रकरण आहे, असंही लेखात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेने पाकिस्तानचे पुढारी कसुरी यांना विरोध केल्याने महाराष्ट्राची बदनामी झाली असे ज्यांना वाटते त्यांनी स्वातीच्या आत्महत्येने महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी झाली काय ते सांगायला हवे, असा टोला  त्यांनी विरोधकांना हाणला आहे. 
एकेकाळी शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ महाराष्ट्रात प्रसिद्ध होता व लातूर पॅटर्नवर महाराष्ट्र फिदा होता. आता स्वातीच्या आत्महत्येने दुष्काळ, दारिद्य्र व आत्महत्येचा नवा ‘पॅटर्न’ उदयास येत असेल तर महाराष्ट्राला तो काळिमा आहे, अशी टीकाही लेखातून करण्यात आली आहे.  शेतकर्‍यांना मदत पोहोचावी व त्यांचे प्राण वाचावेत म्हणून शिवसेनेसारखा पक्ष मदत करत असून त्यात रोज सहकार्याच्या समिधा पडत आहेत, पण आत्महत्या रोखण्यात व स्वातीसारख्यांचे प्राण वाचविण्यात सरकार का कमी पडत आहे, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला आहे.