शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य स्पर्धेऐवजी स्वातीला पासचे २६० रुपये द्यायला हवे होते - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 26, 2015 11:54 IST

राज्य सरकारने बँकॉकला जाणा-या नृत्य पथकाला पैसे देण्याऐवजी लातूरमध्ये बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणा-या मुलीला मदत करायला हवी होती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राज्य सरकारने तिजोरीतून ‘बँकॉक’ला जाणार्‍या नृत्य कलापथकास आठ लाख रुपये दिले, मात्र लातूरमध्ये स्वाती या विद्यार्थीनीने बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत, म्हणून आत्महत्या केली, हे राज्यातील अस्वस्थ मानसिकतेचे विदारक चित्र आहे, अशी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. राज्यात फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच मित्रपक्ष शिवसेनेने भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.  अशा किती स्वाती आज महाराष्ट्रात आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत व सरकार त्यांचे जीव वाचविण्यासाठी काय करणार आहे, असा सवालही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.  
देवेंद्र सरकार वर्षपूर्ती साजरी करीत असताना भाजप मंत्री वर्षपूर्तीचा सोहळा स्वतंत्रपणे साजरा करण्याच्या विचारात आहेत. सोहळा फार भव्यदिव्य नसला (दुष्काळाच्या कारणामुळे) तरी आमचे आम्ही एकटेच सण साजरा करू अशा भूमिकेत सत्तेतील आमचे मित्र आहेत, अशी टीका त्यांवनी केली. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असे हे स्वातीचे आत्महत्या प्रकरण आहे, असंही लेखात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेने पाकिस्तानचे पुढारी कसुरी यांना विरोध केल्याने महाराष्ट्राची बदनामी झाली असे ज्यांना वाटते त्यांनी स्वातीच्या आत्महत्येने महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी झाली काय ते सांगायला हवे, असा टोला  त्यांनी विरोधकांना हाणला आहे. 
एकेकाळी शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ महाराष्ट्रात प्रसिद्ध होता व लातूर पॅटर्नवर महाराष्ट्र फिदा होता. आता स्वातीच्या आत्महत्येने दुष्काळ, दारिद्य्र व आत्महत्येचा नवा ‘पॅटर्न’ उदयास येत असेल तर महाराष्ट्राला तो काळिमा आहे, अशी टीकाही लेखातून करण्यात आली आहे.  शेतकर्‍यांना मदत पोहोचावी व त्यांचे प्राण वाचावेत म्हणून शिवसेनेसारखा पक्ष मदत करत असून त्यात रोज सहकार्याच्या समिधा पडत आहेत, पण आत्महत्या रोखण्यात व स्वातीसारख्यांचे प्राण वाचविण्यात सरकार का कमी पडत आहे, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला आहे.