शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

फडणवीसांच्या काळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारीत मान्यतांचा उद्धव ठाकरेंकडून फेरआढावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 11:10 IST

फडणवीसांच्या नेतृत्वात वाघुर 2288 कोटी, हतनूर 536 कोटी, वरणगाव तळवेल 861 कोटी, शेळगाव येथील 968 कोटी आणि ठाण्यातील भातसा प्रकल्पाला 1491 कोटींची या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 

मुंबई - 2014 विधानसभा निवडणुकीपासून राज्यात सिंचन घोटाळ्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सिंचनाच्या मुद्दावरूनच भाजप नेत्यांकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले होते. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांना मुख्य मुद्दा बनवत भाजपने 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन केले होते. तसेच या मुद्दाचा वापर सत्ता आल्यानंतर पाच वर्षे केला. आता या सिंचन प्रकल्प भाजपच्या मानगुटीवर बसतात की काय असं चित्र निर्माण झाले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात पाच सिंचन प्रकल्पांना दिलेल्या सुधारीत प्रशासकीय मान्यतांचा फेर आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आता याचीही चौकशी  होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठणार आहे.  

राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंचन घोटाळ्याचे आरोपी अजित पवार यांनी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. 

दरम्यान शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षा धुळीत मिळाल्या. त्यामुळे अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म केवळ 80 तासांची ठरली. मात्र या 80 तासांच्या काळात अजित पवार यांच्याविरोधात कथित सिंचन घोटाळ्याच्या सुरू असलेल्या चौकश्या थांबविण्यात आल्या. किंबहुना फाईलं बंद करण्यात आली. त्यामुळे अजित पवार यातून सुटल्याचे समोर आले. 

आता मात्र उलट घडामोडी घडत असून फडणवीसांनी मान्यता दिलेल्या सिंचन प्रकल्पांचाच फेरआढावा घेण्यात येत आहे. फणडवीस सरकारने अखेरच्या मंत्रीमंडळ बैठकीत 6 हजार 144 कोटींच्या पाच प्रकल्पांच्या सुधारीत प्रस्तावाला मान्यता दिली होती. या मान्यतासंदर्भात आढावा घेतला असला तरी याची चौकशी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र चौकशीचा निर्णय झाल्यास फडणवीसांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागू शकतो. 

फडणवीसांच्या नेतृत्वात वाघुर 2288 कोटी, हतनूर 536 कोटी, वरणगाव तळवेल 861 कोटी, शेळगाव येथील 968 कोटी आणि ठाण्यातील भातसा प्रकल्पाला 1491 कोटींची या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.