शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

Narayan Rane: जूनच्या वादळात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार; नारायण राणेंची पुन्हा भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 20:03 IST

Narayan Rane on CM Uddhav Thackeray: नारायण राणे यांनी आज वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊतबद्दल प्रश्न विचारु नका असे म्हणत राऊतांवर टीका केली.

महाराष्ट्रात तीन पक्षांचे ठाकरे सरकार अस्तित्वात येत नाही तोच भाजपाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे सरकार आज जाणार, उद्या पडणार असे अनेकदा सांगितले जात होते. आजही दररोज नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री, नेते, मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करत आहे, अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा भविष्यवाणी केली आहे. 

नारायण राणे यांनी आज वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाले फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर नाही बसलेत, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजुला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटं जातात? एकेदिवशी तर कॅबिनेटला तीन मिनिटांसाठी आले होते. अधिवेशनात अंतिम आठवड्यात उत्तर दिले. कलानगरच्या नाक्यावरचं भाषण विधीमंडळात केल्याची टीका राणे यांनी केली. यानंतर संजय राऊतांवर प्रश्न विचारला असता, संजय राऊतबद्दल प्रश्न विचारु नका असे म्हणत राऊतांवर टीका केली. काळ्या पैशाने घेतलेली संपत्ती ईडीने जप्त केली. त्या माणसाला लोकांना शहाणपणा सांगण्याची नैतिकता नाही. संपादकाला किती पगार असतो? तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही रायगड समुद्रकिनारी प्लॉट घेऊ शकता का? नाहीतर व्हा सगळे संपादक, अशा शब्दांत राऊतांचा समाचार घेतला.

नारायण राणे यांनी याआधी असे अनेकदा तारखा जाहीर केल्या आहेत. पण अद्यापही महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सरकार आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. राऊत तर आणखी २५ वर्षे भाजपाला सत्तेत येण्याची संधी नाही असे म्हणत आहेत. 

राऊतांचे प्रत्यूत्तरगेली ५० वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेसाठी वादळं नवीन नाहीत. वादळं परतून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची क्षमता फक्त राज्यात शिवसेनेतच आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी नारायण राणेंच्या या भविष्यवाणीवर दिले आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे