शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

"उद्धव ठाकरे हे एक बिनडोक राजकारणी, त्यांनी...!" भाजप नेते बावनकुळे यांचा हल्लाबोल; बरंच काही बोलले...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:34 IST

उद्धव ठाकरेंनी अजूनही 'त्या' मानसिकतेतून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी चांगल्या कराव्यात जेणेकरून त्यांच्या पक्षालाही पाठबळ मिळेल," असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी ठाकरेंना दिला...

उद्धव ठाकरे हे एक बिनडोक राजकारणी आहेत. जनतेतील प्रतिमा मलीन झाल्यानंतरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यानंतरही ते दुरुस्त होत नाहीयेत. खरे तर, एका नेत्याकडून १३ खासदार आणि ५० आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचे नेतृत्व कोणीही मान्य करण्यास तयार नाही. म्हणूनच खासदार आणि आमदार निघून गेले. खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता. म्हणून लोक एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यांचेच लोक त्यांच्यापासून निघून गेल्यानंतर, ते भाजपला दोष देतात. अमित शाह, मोदीजी आणि भारतीय जनता पक्षावर ते नेहमीच टीका करतात. त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे की, आपण कुठे चुकलो आहोत? अशा शब्दात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

बावनकुळे पुढे म्हणाले, "जर त्यांनी आमदार आणि खासदारांना योग्य वागणूक दिली असती, तर महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राहिला प्रश्न २०१९ चा, तर गद्दारी केलीचना. गद्दारी झालीच त्यांच्याकडून. ते सरळ भारतीय जनता पक्षासोबत निवडून आले होते. महाराष्ट्राला गद्दारीचे जे गालबोट लागले ते उद्धव ठाकरेंनी लावले आहे. त्यांनीच गद्दारीची सुरुवात केली. जर त्यांनी तेव्हा भाजपासोबत गद्दारी केली नसती, तर महाराष्ट्राचे वेगळे चित्र असते. त्यामुळे आता आपला दोष लोकांवर देणे, अशी भाषणे करत राहणे, माध्यमांचा आणि महाराष्ट्राचा वेळ वाया घालवणे, त्यापेक्षा एका चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल."

आज जी परिस्थिती आहे, त्याहूनही आणखी वाईट परिस्थिती होईल -"उद्धव ठाकरे निराश आहेत आणि असे बोलणे हे वेडेपणाचे लक्षण आणि बिनडोकपणा आहे. अजूनही सुधारत नाहीयेत. मला वाटते की, अमित शाह यांच्यावर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अथवा आमच्या पक्षावर टीका करून काहीही साध्य होणार नाही. आज जी परिस्थिती आहे, त्याहूनही आणखी वाईट परिस्थिती होईल आणि आमचे जनमत आणखी वाढेल. उद्धव ठाकरेंचे जनमत रोज कमी होईल," असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी अजूनही 'त्या' मानसिकतेतून बाहेर पडावे -याशिवाय, "उद्धव ठाकरेंचे या पद्धतीने वागणे आणि कोणत्या घटनेला, ज्या घटनेला तेच जबाबदार आहेत, त्या घटनेला धरून बोलणे, महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे. आता महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यारे राज्य आहे. पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजींचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार आहे. उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी चांगल्या कराव्यात जेणेकरून त्यांच्या पक्षालाही पाठबळ मिळेल," असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी ठाकरेंना दिला. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा