शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शिवसेनेतील नाराज आमदारांना गळ घालण्याची तयारी; ठाकरेंकडून संपर्क झाल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 20:29 IST

या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय.

मुंबई - सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील हालचालींना वेग आला आहे. या सरकारचे डेथ वॉरंट जारी झालंय असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. आता ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांना गळ घालण्यास सुरुवात केल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय. शिंदे गटातील नाराज आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची बातमी ABP माझाने दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन कुठलेही पद आणि प्रतिष्ठा मिळाली नाही. त्याचसोबत ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात जाहीर भाष्य कुठेही केले नाही अशा आमदारांना साद घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

विशेष म्हणजे या आमदारांची एक यादी बनवली असून त्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी संपर्क केल्याचे कळतेय. महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच चर्चा आणि वावड्या उठताना दिसत आहेत कारण २०१९ च्या निवडणुकीनंतर कोण काय करेल आणि कुणाकडे जाईल हे सांगता येत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर यातील बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी आशा होती. ज्यांना कुठलीही पदे मिळाली नाही त्यांची नाराजी सुरुवातीला समोर येत होती. मात्र ही नाराजी रोखण्यास मुख्यमंत्री शिंदेंना यश आले होते. 

मात्र आता जे आमदार नाराज आहेत त्याचसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे यामुळे आपण पुन्हा निवडून येऊ शकतो की नाही अशा लोकांची संपर्क साधण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालाय. एका कॅबिनेट मंत्र्यालाही ठाकरे गटाकडून मोठे पद देण्याची ऑफर करण्यात आले. त्याबाबत संबंधित मंत्र्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावरही ही चर्चा टाकली असल्याचं बातमीत दावा केला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटातील कुणीही आमदार ठाकरे गटात परतले तर राज्यात वातावरणनिर्मिती करता येईल असा प्रयत्न ठाकरेंचा आहे. त्यानुसार सध्या नाराज आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या महाराष्ट्रातील सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे चर्चा आणि वावड्यांना उधाण आले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे