शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिवसेनेतील नाराज आमदारांना गळ घालण्याची तयारी; ठाकरेंकडून संपर्क झाल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 20:29 IST

या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय.

मुंबई - सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील हालचालींना वेग आला आहे. या सरकारचे डेथ वॉरंट जारी झालंय असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. आता ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांना गळ घालण्यास सुरुवात केल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय. शिंदे गटातील नाराज आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची बातमी ABP माझाने दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन कुठलेही पद आणि प्रतिष्ठा मिळाली नाही. त्याचसोबत ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात जाहीर भाष्य कुठेही केले नाही अशा आमदारांना साद घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

विशेष म्हणजे या आमदारांची एक यादी बनवली असून त्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी संपर्क केल्याचे कळतेय. महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच चर्चा आणि वावड्या उठताना दिसत आहेत कारण २०१९ च्या निवडणुकीनंतर कोण काय करेल आणि कुणाकडे जाईल हे सांगता येत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर यातील बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी आशा होती. ज्यांना कुठलीही पदे मिळाली नाही त्यांची नाराजी सुरुवातीला समोर येत होती. मात्र ही नाराजी रोखण्यास मुख्यमंत्री शिंदेंना यश आले होते. 

मात्र आता जे आमदार नाराज आहेत त्याचसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे यामुळे आपण पुन्हा निवडून येऊ शकतो की नाही अशा लोकांची संपर्क साधण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालाय. एका कॅबिनेट मंत्र्यालाही ठाकरे गटाकडून मोठे पद देण्याची ऑफर करण्यात आले. त्याबाबत संबंधित मंत्र्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावरही ही चर्चा टाकली असल्याचं बातमीत दावा केला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटातील कुणीही आमदार ठाकरे गटात परतले तर राज्यात वातावरणनिर्मिती करता येईल असा प्रयत्न ठाकरेंचा आहे. त्यानुसार सध्या नाराज आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या महाराष्ट्रातील सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे चर्चा आणि वावड्यांना उधाण आले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे