शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं; मैत्रीदिनी शहाजी पाटलांनी व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 12:05 IST

२-४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार सुकर होईल आणि सरकार योग्य दिशेने काम करेल असा विश्वास शहाजी पाटलांनी व्यक्त केला.

पंढरपूर - उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांची आहे. भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून येईल असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे. कुठलीही निवडणूक लागल्यानंतर निकाल लागेपर्यंत सर्वच नेते आपापले विजयाचे दावे करतात. प्रत्येकजण विजयाचा दावा करतो. निकाल लागल्यावर वास्तव कळेल असा टोला सांगोल्याचे शिंदे गटाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. 

शहाजी पाटील म्हणाले की, २-४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार सुकर होईल आणि सरकार योग्य दिशेने काम करेल. राज्यपालांबाबत एखादं विधान करणे गैर आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्याला वेगळे महत्व असतं. बोलत असताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. मुंबईबाबत त्यांचे विधान हे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला खटकणारं होतं. त्याबद्दल त्यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न सोडवणं आणि समस्येतून बाहेर काढण्यासाठी सर्व पक्षांनी एकजूटीने काम करणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच विधान भवनातील कुठल्याही खुर्च्या मोकळ्या नाहीत. अधिवेशन सुरू झालं नाही. २ लोकांचे सरकार चाललंय हा विरोधकांचा गैरसमज आहे. कुठल्याही सरकारचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागेल असा विश्वास आहे. तर धनुष्यबाण चिन्हाची लढाई कायद्याने सुप्रीम कोर्टात सुरू आहे. परंतु बहुमताचा विचार केला तर धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असंही आमदार शहाजी पाटील म्हणाले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करून केंद्राशी सुसंवाद ठेवत राज्याचा विकास करत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी आणत आहे. केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकार समान विचारांची आल्यामुळे येत्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास वेगाने होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना पुरक काम करत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास होण्यास फायदेशीर ठरेल असं शहाजी पाटलांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना