शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुख्यमंत्री फडणवीसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय का? पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:22 IST

Udayanraje Bhosale, Nagpur Violence: खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली

Udayanraje Bhosale, Nagpur Violence: औरंगजेबाची कबर हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यावर उतरला. यात काहींनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्कीही केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनाही आवश्यक ती कारवाई करावी लागली. या राड्यात उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांना दुखापत झाली. या घटनेवरून विविध ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या प्रश्नावरही स्पष्टपणे बोलले.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्याच मित्रपक्षांचे लोक त्यांना अडचणीत आणू पाहत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी उदयनराजेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, "असे अजिबात नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये दंगली मोठ्या प्रमाणावर होत होत्या. त्यामानाने आता दंगली घडवणाऱ्यांना आळा घालण्यात आला आहे. पण जे लोकं दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतात ते कुठल्याही पक्षाचे किंवा जातीधर्माचे नसतात, ते व्यक्तिकेंद्रित असतात. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी ते लोक अशा गोष्टी करतात. ही विकृती ठेचण्याची जबाबदारी एखाद्या पक्षाची नसून देशातील प्रत्येक नागरिकांची आहे."

"दंगल घडवून आणावी अशी सामान्य माणसाची इच्छा नसते. काही समाजकंटक मुद्दाम वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी अशा घटना घडवून आणतात. जे लोक दंगली करतात त्यांना कुठलाही पक्ष, कुठलीही जात किंवा धर्म नसतो. हे सर्व लोक व्यक्तिकेंद्रित प्रकारचे असतात. त्यामुळे सामान्य माणसांनी शांतता राखावी," असे आवाहन त्यांनी केली.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर