शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

"वैभव नाईकांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी ५० लाख रुपये दिले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:58 IST

शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत असा आरोप राऊतांनी केले.

रत्नागिरी - सिंधुदुर्गात शिवसेना आमदार वैभव नाईक यांना पाडण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला ५० लाख रुपये देत स्वत:च्या पक्षातील उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि त्यांच्या लोकांना पोसण्याचं काम उदय सामंतांनी केले. आईबापाची शपथ घेऊन सांगावं नाही केले असा इशाराच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सामंतांना देत गंभीर आरोप केले आहे. वैभव नाईक, उदय सामंत हे शिवसेना आमदार आहेत तर विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. सध्या उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत. 

विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत. राणे आणि त्यांना माणसांना पोसण्याचं काम त्याने केले. वैभव नाईक स्वत:च्या पक्षाचे असतानाही विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्याला आर्थिक मदत करण्याचं काम उदय सामंत यांनी केले. ५० लाख रुपये विरोधी उमेदवाराला दिले असा गंभीर आरोप उदय सामंतावर केला.  

तर विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत. ते खरे असतील कुणी माझ्याकडून पैसे घेतले. कुणी किती पैसे घेतले हे सांगावं. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. विनायक राऊत हे देशाचे नेते आहेत. काळ आणि नियती राऊतांना उत्तर देईल असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना दिले आहे. 

विनायक राऊतांचा सातत्याने हल्लाबोलभाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते. त्यावर अख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. दुर्देवाने शिवसेनेचे ४० आमदार त्याला बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. 

तसेच विनायत राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळं शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं असल्याचं, विनायक राऊत यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Uday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना