शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यांना...; मंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांसमोर मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:20 IST

मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी अशी मागणी सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली.

पुणे - मराठी भाषा आणि मराठी माणसांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. पुण्यातील विश्व मराठी संमेलनात सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमोर मागणी केली. 

मंत्री उदय सामंत म्हणाले की, गेल्या २ महिन्यापासून महाराष्ट्रात जे प्रकार घडतायेत. आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. राज्यात प्रत्येक जाती धर्माची माणसे राहतात. तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषाही आणतो. या भाषेचा आदर आपण नेहमी केला आहे. पाहुणचार आपण केलेला आहे. आपण त्यांच्या भाषेचा अनादर केला नाही. भविष्यात कुठलाही महाराष्ट्रातील युवक त्यांच्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे. कठोर शासन केले पाहिजे ही महाराष्ट्रातील मराठी युवांची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी वाढवणारे सर्व व्यासपीठावर आले आहेत. आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. ही माणसं कुठलाही निधी न घेता परदेशात मराठीचं संवर्धन करतायेत. २५ देशातील सहकारी आज इथं आले आहेत. काही लोक आमच्या विभागाकडून पैसे घेतात. मराठी माणसांच्या उद्धारासाठी हे पैसे वापरले जातात. मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र येणे गरजेचे आहे. मराठीचा अपमान होणार नाही याची खबरदारी शासन म्हणून आम्ही घेऊ असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. 

दरम्यान, माझी मराठी भाषा शालेय जीवनापर्यंत पोहचली पाहिजे. महाविद्यालयापर्यंत पोहचली आहे. आजच्या शोभायात्रेत १०४ संस्थांचे जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. मराठी भाषा टिकवणे, मराठी भाषेची अस्मिता टिकवणे आणि मराठी भाषेवर आक्रमण होत असेल तर त्याला आक्रमकपणे उत्तर देणे ही जबाबदारी युवा पिढीने हातात घेतली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मराठी लिहिली, मराठी भाषा वाढवली त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे असंही मंत्री उदय सामंत यांनी केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी