शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यांना...; मंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांसमोर मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:20 IST

मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी अशी मागणी सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली.

पुणे - मराठी भाषा आणि मराठी माणसांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. पुण्यातील विश्व मराठी संमेलनात सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमोर मागणी केली. 

मंत्री उदय सामंत म्हणाले की, गेल्या २ महिन्यापासून महाराष्ट्रात जे प्रकार घडतायेत. आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. राज्यात प्रत्येक जाती धर्माची माणसे राहतात. तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषाही आणतो. या भाषेचा आदर आपण नेहमी केला आहे. पाहुणचार आपण केलेला आहे. आपण त्यांच्या भाषेचा अनादर केला नाही. भविष्यात कुठलाही महाराष्ट्रातील युवक त्यांच्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे. कठोर शासन केले पाहिजे ही महाराष्ट्रातील मराठी युवांची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी वाढवणारे सर्व व्यासपीठावर आले आहेत. आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. ही माणसं कुठलाही निधी न घेता परदेशात मराठीचं संवर्धन करतायेत. २५ देशातील सहकारी आज इथं आले आहेत. काही लोक आमच्या विभागाकडून पैसे घेतात. मराठी माणसांच्या उद्धारासाठी हे पैसे वापरले जातात. मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र येणे गरजेचे आहे. मराठीचा अपमान होणार नाही याची खबरदारी शासन म्हणून आम्ही घेऊ असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. 

दरम्यान, माझी मराठी भाषा शालेय जीवनापर्यंत पोहचली पाहिजे. महाविद्यालयापर्यंत पोहचली आहे. आजच्या शोभायात्रेत १०४ संस्थांचे जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. मराठी भाषा टिकवणे, मराठी भाषेची अस्मिता टिकवणे आणि मराठी भाषेवर आक्रमण होत असेल तर त्याला आक्रमकपणे उत्तर देणे ही जबाबदारी युवा पिढीने हातात घेतली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मराठी लिहिली, मराठी भाषा वाढवली त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे असंही मंत्री उदय सामंत यांनी केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी