शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यांना...; मंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांसमोर मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:20 IST

मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी अशी मागणी सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली.

पुणे - मराठी भाषा आणि मराठी माणसांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. पुण्यातील विश्व मराठी संमेलनात सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमोर मागणी केली. 

मंत्री उदय सामंत म्हणाले की, गेल्या २ महिन्यापासून महाराष्ट्रात जे प्रकार घडतायेत. आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. राज्यात प्रत्येक जाती धर्माची माणसे राहतात. तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषाही आणतो. या भाषेचा आदर आपण नेहमी केला आहे. पाहुणचार आपण केलेला आहे. आपण त्यांच्या भाषेचा अनादर केला नाही. भविष्यात कुठलाही महाराष्ट्रातील युवक त्यांच्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे. कठोर शासन केले पाहिजे ही महाराष्ट्रातील मराठी युवांची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी वाढवणारे सर्व व्यासपीठावर आले आहेत. आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. ही माणसं कुठलाही निधी न घेता परदेशात मराठीचं संवर्धन करतायेत. २५ देशातील सहकारी आज इथं आले आहेत. काही लोक आमच्या विभागाकडून पैसे घेतात. मराठी माणसांच्या उद्धारासाठी हे पैसे वापरले जातात. मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र येणे गरजेचे आहे. मराठीचा अपमान होणार नाही याची खबरदारी शासन म्हणून आम्ही घेऊ असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. 

दरम्यान, माझी मराठी भाषा शालेय जीवनापर्यंत पोहचली पाहिजे. महाविद्यालयापर्यंत पोहचली आहे. आजच्या शोभायात्रेत १०४ संस्थांचे जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. मराठी भाषा टिकवणे, मराठी भाषेची अस्मिता टिकवणे आणि मराठी भाषेवर आक्रमण होत असेल तर त्याला आक्रमकपणे उत्तर देणे ही जबाबदारी युवा पिढीने हातात घेतली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मराठी लिहिली, मराठी भाषा वाढवली त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे असंही मंत्री उदय सामंत यांनी केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी