शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे गटाचे १३, राष्ट्रवादीचे २० आमदार, तर काँग्रेसचे बडे नेते CM एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:02 IST

Maharashtra Politics: मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच महाविकास आघाडी आणि सत्ताधारी नेते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्या बाजूने निकाल देईल, असे दोन्ही गटांना वाटत आहे. मात्र, निकालविरोधात गेला तर त्याची जुळवाजुळव शिंदे गट आणि भाजपकडून सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता ठाकरे गटाचे १३ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की,  अशा अनेक चर्चा आहेत. ठाकरे सेनेतील उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. महाबळेश्वर येथे अनेक काँग्रेस नेते एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या चर्चाही आहेत. अशा अनेक चर्चा सुरु आहेत. चर्चा भरपूर होऊ शकतात. मात्र, ते सत्यात उतरले पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

जगातील एकही विद्वान खासदार महोदयाच्या स्पर्धेत नाही

उदय सामंत यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. जगातील सगळ्यात विद्वान आणि शहाणे ते असल्यामुळे त्यांच्याबाबत बोलणे सोडून दिले आहे. जगाच्या पातळीवर असा एकही विद्वान शिल्लक राहिलेला नाही की जो त्या खासदार महोदयांच्या स्पर्धेत असेल. सगळ्यांना क्रॉस करून सगळ्यांच्या पुढे जाऊन देशाचे महाविद्वान ते बनलेले आहेत. म्हणून ते सगळ्यांची अक्कल काढतात. जगातील सगळ्या विद्वानांपेक्षा त्यांना अक्कल जास्त आहे, त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचे, अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली. 

दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचक विधान केले आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेतील. निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंतच्या काळात काहीही घडू शकते, असे सूचक विधान त्यांनी केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी