शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भामटेत चिमुकल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:59 IST

भामटे (ता. करवीर) येथे  दोन सख्या भावांचा गाव तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ महादेव पाटील (वय ८) व राजवीर महादेव पाटील (वय ६)अशी या चिमुखल्यांची नावे आहेत.

प्रकाश पाटील

कोपार्डे -

भामटे (ता. करवीर) येथे  दोन सख्या भावांचा गाव तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ महादेव पाटील (वय ८) व राजवीर महादेव पाटील (वय ६)अशी या चिमुखल्यांची नावे आहेत. ही घटना सकाळी साडे आकराच्या दरम्यान घडली. अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी समर्थ व राजवीर यांची आजी शांताबाई पाटील या दररोज गावा जवळ असणाऱ्या वाघजाई डोंगरावर जनावरे चरण्यासाठी घेऊन जातात. जनावरे परत घेऊन येण्याच्या वाटेवरच गावतळे आहे. तिथे समर्थ व राजवीर आजीची वाट पाहत बसत असत.आज ११ च्या दरम्यान आजी शांताबाई जनावरे घेऊन डोंगरातून घरी येताना याच गावतळ्यात जनावरांना पाणी दाखवण्यासाठी गेल्या होत्या. आजीच्या मागून समर्थ व राजवीर तळ्याजवळ गेले होते. 

जनावरांना पाणी दाखवून शांताबाई या घरी परतताना समर्थ व राजवीर दोघांनाही घरी बरोबर चला म्हणून दटावून घेऊन आल्या. जनावरे पुढे पळत सुटल्याने शांताबाई पुढे आल्या. समर्थ व राजवीर यांनी डोळा चुकवून गावतळ्यात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी तळ्यावर कोणी नव्हते. समर्थला थोडे फार पोहता येत होते पण राजवीरला पोहता येत नव्हते. आंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर राजवीर पाण्यात खोल पाण्यात बुडताना समर्थने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असावा.पण दोघेही खोल पाण्यात गेल्याने समर्थसह राजवीर ही पाण्यात बुडाला असावा.दरम्यान समर्थ व राजवीर दोघेही बराच वेळ घरी आले नाहीत म्हणून या दोघांच्या आई व आजीने चुलत भाऊ अथर्वला पाठवून दिले. यावेळी तळ्याच्या काठावर कपडे दिसले पण समर्थ आणि राजवीर नसल्याचे घरी सांगितले. वडील महादेव चुलता व आईतळ्यावर आले.पण दोघेही दिसत नसल्याने पाण्यात शोध घेण्यास सुरुवात केली. चिवकाटी व गळाच्या साहाय्याने शोधाशोध केली. तळ्याच्या खोल भागात ग्रामस्थांना दोघे बुडालेले सापडले.प्रथम उपचार म्हणून दोघांच्याही पोटातील पाणी काढून उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा पुर्वीच समर्थ व राजवीर णा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.दोन सख्या चिमुखल्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कळताच गावावर शोककळा पसरली. नातेवाईकांनी आई,वडील चुलते,चुलती व आजीने हंबरडा फोडल्याने ह्रदय पिळवटून टाकणारे चित्र होते. होता.