शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
4
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
5
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
6
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
7
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
10
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
11
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
12
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
13
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
14
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
15
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
16
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
17
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
18
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
19
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
20
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

बँकेच्या थकबाकीने दोन भावंडांनी केले विषप्राशन

By admin | Updated: February 4, 2015 01:51 IST

एकाचा मृत्यू, दुस-याची मृत्यूशी झुंज.

वाशिम - ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज काही प्रमाणात फेडल्यानंतर पुढे कर्जमाफीच्या घोषणेत उर्वरित कर्ज माफ झाले. बँकेनेही तसे रीतसर कळविले; परंतु काही दिवसां पूर्वीच अव्वाच्या सव्वा रक्कम भरण्यासंदर्भात बँकेमार्फत वकिलाची नोटीस मिळाल्याने दोन शेतकरी भावंडांनी विष प्राशन केले. यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्‍याची मृत्यूशी झुंज सुरूआहे. या घटनेमुळे बँकेच्या कामकाजाबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील सायखेडा येथील गोविंद शिवराम गावंडे यांनी सन २00४ मध्ये ट्रॅक्टर घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या उकळी पेन शाखेकडून ४ लाख ८४ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची नियमित परतफेड ते करीत होते. सन २00८ मध्ये ह्यपंतप्रधान पॅकेजह्णमध्ये हे कर्ज माफ करण्यात आले, अशी रीतसर माहिती गावंडे यांना कळविण्यात आली. आता तब्बल सात वर्षांनंतर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात गावंडे कुटुंबीयांना ११ लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे कळवून त्याचा भरणा सात दिवसांच्या आत करण्याची ताकीद बँकेकडून देण्यात आली होती. या प्रकाराने गोविंद गावंडे यांची तरुण मुलं राजू (३५) आणि संजय गोविंद गावंडे (३0) ही चक्रावून गेली. त्यांनी बँकेचे कार्यालय गाठून चौकशी केली. ही रक्कम भरावीच लागेल, असे तेथील अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. या प्रकारामुळे गावंडे कुटुंब प्रचंड तणावात होते. त्यातच २५ जानेवारी रोजी राजू आणि संजय या दोन्ही भावांनी विष प्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी ताततडीने त्यांना रुग्णालयात हलविले; परंतु प्रकृती नाजूक असल्याने दोघांनाही अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार, १ फेब्रुवारीला संजय गावंडे यांची प्राणज्योत मालवली, तर राजू गावंडे यांची प्रकृतीही अत्यवस्थ असल्याचे समजते.