शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बँकेच्या थकबाकीने दोन भावंडांनी केले विषप्राशन

By admin | Updated: February 4, 2015 01:51 IST

एकाचा मृत्यू, दुस-याची मृत्यूशी झुंज.

वाशिम - ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज काही प्रमाणात फेडल्यानंतर पुढे कर्जमाफीच्या घोषणेत उर्वरित कर्ज माफ झाले. बँकेनेही तसे रीतसर कळविले; परंतु काही दिवसां पूर्वीच अव्वाच्या सव्वा रक्कम भरण्यासंदर्भात बँकेमार्फत वकिलाची नोटीस मिळाल्याने दोन शेतकरी भावंडांनी विष प्राशन केले. यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्‍याची मृत्यूशी झुंज सुरूआहे. या घटनेमुळे बँकेच्या कामकाजाबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील सायखेडा येथील गोविंद शिवराम गावंडे यांनी सन २00४ मध्ये ट्रॅक्टर घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या उकळी पेन शाखेकडून ४ लाख ८४ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची नियमित परतफेड ते करीत होते. सन २00८ मध्ये ह्यपंतप्रधान पॅकेजह्णमध्ये हे कर्ज माफ करण्यात आले, अशी रीतसर माहिती गावंडे यांना कळविण्यात आली. आता तब्बल सात वर्षांनंतर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात गावंडे कुटुंबीयांना ११ लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे कळवून त्याचा भरणा सात दिवसांच्या आत करण्याची ताकीद बँकेकडून देण्यात आली होती. या प्रकाराने गोविंद गावंडे यांची तरुण मुलं राजू (३५) आणि संजय गोविंद गावंडे (३0) ही चक्रावून गेली. त्यांनी बँकेचे कार्यालय गाठून चौकशी केली. ही रक्कम भरावीच लागेल, असे तेथील अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. या प्रकारामुळे गावंडे कुटुंब प्रचंड तणावात होते. त्यातच २५ जानेवारी रोजी राजू आणि संजय या दोन्ही भावांनी विष प्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी ताततडीने त्यांना रुग्णालयात हलविले; परंतु प्रकृती नाजूक असल्याने दोघांनाही अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार, १ फेब्रुवारीला संजय गावंडे यांची प्राणज्योत मालवली, तर राजू गावंडे यांची प्रकृतीही अत्यवस्थ असल्याचे समजते.