शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दोन लाख सोलापुरी चादरींची पूरग्रस्तांना ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:42 IST

संकटसमयी उत्पादन दुपटीने वाढविले; दिवस-रात्र कारखानदार अन् कामगारांचे उत्स्फूर्तपणे काम

ठळक मुद्दे देशातील इतर ठिकाणाहून विक्रीसाठी बनविण्यात आलेल्या चादरीही पूरग्रस्तांना देण्यात आल्याकेवळ १५ दिवसांत जवळपास दोन लाख चादरी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्यासोलापुरातील अनेक सामाजिक संस्थांनी हजारो चादरी आमच्याकडून पूरग्रस्तांना देण्यासाठी नेल्या

महेश कुलकर्णी 

सोलापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाने कमी कालावधीत दोन लाख चादरी उत्पादित केल्या आहेत. सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मागणीला प्रतिसाद देऊन मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करायच्या उद्देशाने दिवस-रात्र उत्पादन करून या चादरी पाठविण्यात आल्या आहेत.

भूकंप किंवा महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी उघड्यावर पडलेल्या संसाराला आधार देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंसोबतच उबदार कपड्याचीही आवश्यकता असते. चादरीचे उत्पादन महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी होते. भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी आणि सोलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चादरी बनतात. इचलकरंजी परिसराच्या काही भागात पुराचे पाणी गेल्यामुळे येथील उत्पादन पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त परिसराच्या जवळचे गाव म्हणजे सोलापूर.

एकेकाळी सोलापूर चादरी बनण्यासाठी महाराष्ट्रात क्रमांक एक होते, परंतु शासनाचे धोरण आणि अर्थपुरवठ्याअभावी चादरी बनविणारे लुम याठिकाणी कमी झाले. अशाही परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीसाठी सोलापूरच्या कारखानदारांनी दुप्पट उत्पादन केले. अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी आपणही कुठे मागे राहता कामा नये, या उद्देशाने कामगारांनीही नेहमीपेक्षा दुप्पट योगदान देऊन मोठ्या प्रमाणात चादरींचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर येथे झालेल्या भूकंपावेळीही सोलापूर चादरींनी संकटात सापडलेल्या भूकंपग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता.

पंधरा दिवसांत दोन लाख चादरींचे उत्पादन- सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोलापूरच्या कारखानदारांना विनंती करून मागणी नोंदविली. याबरोबरच देशातील इतर ठिकाणाहून विक्रीसाठी बनविण्यात आलेल्या चादरीही पूरग्रस्तांना देण्यात आल्या. विक्रीसाठी आगाऊ बुकिंग करणाºया व्यापाºयांनीही मोठ्या मनाने तयार चादरी पूरग्रस्तांना पाठविण्याची परवानगी दिल्याने केवळ १५ दिवसांत जवळपास दोन लाख चादरी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या.

सोलापुरातील अनेक सामाजिक संस्थांनी हजारो चादरी आमच्याकडून पूरग्रस्तांना देण्यासाठी नेल्या आहेत. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही सर्व दुकानातील चादरी गोळा करून सामाजिक संस्थांना दिल्या.- बसवराज निंगदळ्ळी, चादर विक्रेते.

यंत्रमागधारक संघाची मदत- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नेहमीच मदतीला तत्पर असणाºया सोलापूरकरांच्या यंत्रमागधारक संघाने सर्वप्रथम पूरग्रस्तांना एक हजार चादरी,  पाच हजार टॉवेल्स पाठविले. याबरोबरच जीवनावश्यक वस्तू आणि धान्यही संघाच्या वतीने पाठविण्यात आले. ही मदत प्रत्यक्ष जाऊन पोहोचविण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा शहरातील पाणी सध्या ओसरले आहे. येथे प्रशासनाने साफसफाईचे काम वेगाने सुरू केलेले आहे; मात्र ग्र्रामीण भागातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आजही आमच्याकडे चादरी मागणी नोंदवत आहेत. आम्ही वेगाने ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष यंत्रमागधारक संघ, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरTextile Industryवस्त्रोद्योग