शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

ठाणे पोस्टातील दोन वृद्ध झाडूवालींना मिळाले निवृत्तिवेतन

By admin | Updated: April 13, 2017 00:59 IST

पोस्टल स्टोअर्स डिपार्टमेंटच्या ठाणे शहरातील दोन कार्यालयांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ हंगामी सफाई कर्मचारी म्हणून काम करून आता वयाची सत्तरी पार केलेल्या

मुंबई : पोस्टल स्टोअर्स डिपार्टमेंटच्या ठाणे शहरातील दोन कार्यालयांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ हंगामी सफाई कर्मचारी म्हणून काम करून आता वयाची सत्तरी पार केलेल्या दोन महिलांना तीन महिन्यांत रीतसर पेन्शन देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. अजय गडकरी यांनी दिलेल्या या निकालाने शांताबाई जी. नाईक आणि सीताबाई आर. मोरे या दोघींना न्याय मिळाला आहे. मुंबईत सातरस्ता येथील रसूल जिवास चाळीत राहणाऱ्या शांताबाई आज ७६ वर्षांच्या आहेत. तर, आंबेडकर नगर, कसारा येथील सीताबाई ७१ वर्षांच्या आहेत. निवृत्तीचे ६० वर्षे हे नियत वय उलटून अनुक्रमे १६ व ११ वर्षे झाल्यानंतर त्यांना न्याय मिळाला आहे. दोघी टपाल खात्यात ‘ग्रुप डी’ कर्मचारी म्हणून नियमित नोकरीत होत्या, असे मानून नेमणुकीच्या दिवसापासून ते निवृत्तीच्या तारखेपर्यंत सेवाकाळ गृहीत धरून पेन्शनचा नियमानुसार हिशेब करावा व ते तीन महिन्यांत सुरू करावे, असा आदेश न्यायालयाने दिला.शांताबाई आणि सीताबाई टपाल खात्याच्या दोन कार्यालयांमध्ये झाडलोट करणे, पाणी भरून ठेवणे व स्वच्छतागृहे स्वच्छ करणे अशी कामे सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास करत असत. वयाची साठी उलटून गेल्यावरही हे काम त्यांनी केले. तरीही त्यांना हंगामी नोकरीत ठेवले. याविरुद्ध दोघींनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) दाद मागितली. तेव्हा त्यांना पेन्शन द्यावी, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला. याविरुद्ध टपाल खात्याने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. दोघींची नेमणूक हंगामी म्हणून केली गेली होती व त्या दररोज दोन-तीन तास काम करत होत्या या टपाल खात्याच्या म्हणण्यास पुरावा नाही. सरकारने आदर्श ‘एम्प्लॉयर’ म्हणून वर्तन करणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन सरकार त्यांची पिळवणूक करू शकत नाही, असे खंडपीठाने सुनावले.टपाल खात्यासाठी अ‍ॅड. नीता मसूरकर व अ‍ॅड. एन. आर. प्रजापती यांनी तर, अ‍ॅड. अंजली हेलेकर यांनी ‘अमायकस क्युरी’ म्हणून काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)