शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 06:18 IST

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई: आरक्षणावरुन मराठा समाजामध्ये खदखद असून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शासनाने दिलेले एसईबीसी १० टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांविरोधात असहकार आंदोलन छेडण्याची तयारी सुरु आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच हजार उमेदवार- छत्रपती संभाजीनगर जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक शनिवारी  पार पडली. बठकीत सुमारे पाच हजार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, जरांगे यांनी दोन शिव्या घातल्या तर शासनाने त्यांच्यावर एसआयटी नियुक्त केली. 

- मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. असे असताना पुन्हा तसेच ५० टक्क्यांबाहेर आरक्षण माथी मारण्यात आले. हे आरक्षण जरांगे यांनी नाकारल्याने त्यांच्याविरोधात सरकारने कट रचण्यास सुरुवात केल्याने मराठा समाज संतप्त आहे. 

राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर बहिष्कार  कोणत्याही राजकीय पक्षाची सभा असो किंवा मोर्चा, बैठकांवर मराठा समाजाने बहिष्कार घालावा अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे, असा निर्णय घेण्यात आला.  

बैठकीत मंजूर झालेले ठरावराजकीय स्टेजवर मराठा समाज जाणार नाही, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जरांगे-पाटील ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असा ठराव घेण्यात आला.

आमदार पुत्राला उद्घाटन करण्यास केला विरोधतुगंत (ता. पंढरपूर) येथे एका विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त माढा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे आले होते. यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन रणजितसिंह शिंदे यांना घेराव घातला. गावात नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात का आलात? तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको का? असे म्हणत रणजितसिंह यांना आंदोलकांनी गावातून काढता पाय घेण्यास भाग पाडले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक