शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

संतोष देशमुख प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; मनोज जरांगे म्हणाले, “सगळ्यांची नार्को टेस्ट करा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:30 IST

Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते. सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे राजकीय पाठबळ आरोपींना आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे. सुरेश धस जे बोलत आहेत, ते फडणवीस यांच्या आदेशावरून बोलत आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, आरोपींना पुण्यातून अटक होत असल्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत टीका केली आहे. यातच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.

सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता एक काम सरकारकडून होणे गरजेचे आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठे रॅकेट आहे. पुण्यातून सगळ्यांना पकडले जात आहे, याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण सांभाळत आहे, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

सरकारने यांना पाठिशी घालू नये

देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केला. तुम्ही त्यांना सांभाळत आहात, सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे. हा डावच आहे. सरकारमधील मंत्री याला खतपाणी घालत आहेत. इतके दिवस लपून राहतात. सामूहिक कट शिजत आहे. सरकारमधले मंत्री-आमदार यांना शिकवतात. बीडचे नाव बदनाम केले, आता पुण्याच नाव खराब करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

दरम्यान, यांचा बाप आला, तरी हे प्रकरण आम्ही थंड होऊ देणार नाही. गृहमंत्रालयाला एकच सांगणे आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सोडू नका. तेही खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते तितकेच जबाबदार आहेत. लेकरु गेले याचे दु:खच नाही. गुन्हेगारांना लपवून ठेवणे ही भूमिका चांगली नाही. यांना धडा शिकवणे गरजेच आहे, या शब्दांत हल्लाबोल करत , या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील