शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

संतोष देशमुख प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; मनोज जरांगे म्हणाले, “सगळ्यांची नार्को टेस्ट करा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:30 IST

Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते. सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे राजकीय पाठबळ आरोपींना आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे. सुरेश धस जे बोलत आहेत, ते फडणवीस यांच्या आदेशावरून बोलत आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, आरोपींना पुण्यातून अटक होत असल्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत टीका केली आहे. यातच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.

सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता एक काम सरकारकडून होणे गरजेचे आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठे रॅकेट आहे. पुण्यातून सगळ्यांना पकडले जात आहे, याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण सांभाळत आहे, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

सरकारने यांना पाठिशी घालू नये

देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केला. तुम्ही त्यांना सांभाळत आहात, सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे. हा डावच आहे. सरकारमधील मंत्री याला खतपाणी घालत आहेत. इतके दिवस लपून राहतात. सामूहिक कट शिजत आहे. सरकारमधले मंत्री-आमदार यांना शिकवतात. बीडचे नाव बदनाम केले, आता पुण्याच नाव खराब करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

दरम्यान, यांचा बाप आला, तरी हे प्रकरण आम्ही थंड होऊ देणार नाही. गृहमंत्रालयाला एकच सांगणे आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सोडू नका. तेही खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते तितकेच जबाबदार आहेत. लेकरु गेले याचे दु:खच नाही. गुन्हेगारांना लपवून ठेवणे ही भूमिका चांगली नाही. यांना धडा शिकवणे गरजेच आहे, या शब्दांत हल्लाबोल करत , या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील